AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान PoK मधून आपलं सैन्य मागे बोलावत नाही, तोपर्यंत विरोध कायम : सज्जाद राजा

पाकिस्तान व्याप्त काश्मिरमधून पाकिस्तान आपलं सैन्य मागे बोलावत नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहिलं, असं मत सज्जाद राजा यांनी व्यक्त केलं आहे.

पाकिस्तान PoK मधून आपलं सैन्य मागे बोलावत नाही, तोपर्यंत विरोध कायम : सज्जाद राजा
| Updated on: Oct 18, 2020 | 3:47 PM
Share

गिलगिट : पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमधील (Gilgit-Baltistan) नेते सज्जाद राजा (Sajjad Raja) यांनी पाकिस्तानकडून (Pakistan) जम्मू-काश्मिरवर (Jammu Kashmir) झालेल्या पहिल्या हल्ल्याचा दिवस म्हणजेच 22 ऑक्टोबर 1947 काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी गिलगिट-बाल्टिस्तानमधील नागरिकांना हा दिवस विरोध दिवस म्हणून पाळण्याचं आवाहन केलं आहे. जोपर्यंत पाकिस्तान व्याप्त काश्मिरमधून पाकिस्तान आपलं सैन्य मागे बोलावत नाही, तोपर्यंत हा विरोध कायम राहिलं, असंही सज्जाद राजा यांनी सांगितलं (Gilgit Baltistan activist Sajjad Raja resistance against Pakistan pok).

सज्जाद राजा यांनी ट्विट केलं, “22 ऑक्टोबरचा दिवस आपण विरोध दिवस म्हणून साजरा करायला हवा. पाकिस्तानने 22 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू-काश्मिरवर हल्ला केला आणि जम्मू काश्मिरची फाळणी झाली. मात्र जोपर्यंत पाकिस्तान या भागातून आपलं सैन्य आणि पाकिस्तानच्या सर्व नागरिकांना येथून मागे बोलावत नाही तोपर्यंत आमचा विरोध कायम राहिलं. पाकिस्तानच्या नियंत्रणाला आमचा स्पष्ट नकार आहे.”

“तो जम्मू-काश्मिरच्या इतिहासातील ‘सर्वात काळा दिवस”

दक्षिण आशियाच्या अभ्यासाठी नुकताच युरोपीय फाऊंडेशनने (EFSAS) नुकताच 22 ऑक्टोबरला जम्मू-काश्मिरच्या इतिहासातील ‘सर्वात काळा दिवस’ म्हटलं होतं. काश्मिरच्या या भागावर ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानकडून ऑपरेशन गुलमर्ग सुरु करण्यात आलं होतं.

“पाकिस्तानच्या हल्ल्यात 35,000 ते 40,000 काश्मिरी नागरिकांचा मृत्यू”

युरोपियन थिंक टँकने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मू-काश्मिरमधील जवळपास 35,000 ते 40,000 रहिवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच जम्मू-काश्मिरची विभागणी देखील झाली होती.

“गिलगिट-बाल्टिस्तानवर हल्ला करणारे हेच जम्मू काश्मिरचे सर्वात मोठे शत्रू आहेत. 22 ऑक्टोबर 1947 चा हल्ला जम्मू-काश्मिरच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस आहे,” असंही युरोपियन थिंक टँकने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनाचं हसत हसत स्वागत, हे माझं हिंदुत्व नाही : उद्धव ठाकरे

‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, मग बाईसाहेब मुंबईत पर्यटनासाठी आला होता का?’ नितीन राऊतांचा कंगनाला सवाल

पाकिस्तानशी बोलणी झालीच, तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर : राजनाथ सिंह

Gilgit Baltistan activist Sajjad Raja resistance against Pakistan pok

Follow Us
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...