AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापूरात सगळं वाहून गेलं, मात्र नेपाळमधील हे हिरवं घर कसं ताठ उभं! तुम्हालाही असंच मजबूत घर हवंय का? करणार काय?

Nepal Flood Green House: नेपाळमधील महापूरात संपूर्ण गाव बेचिराख झाले. पण 40 वर्षे जुने दोन ते तीन मजली घर मात्र ताठ उभं दिसले. सगळ्या बाजूने पुराचे तडाखे बसत असतानाही हे घर डगमगलं नाही. तुम्हालाही असंच मजबूत घर हवं आहे का? काय आहे त्यामागील रहस्य?

महापूरात सगळं वाहून गेलं, मात्र नेपाळमधील हे हिरवं घर कसं ताठ उभं! तुम्हालाही असंच मजबूत घर हवंय का? करणार काय?
नेपाळ महापूर, हिरवं घर
| Updated on: Sep 04, 2026 | 1:51 PM
Share

नेपाळमधील बागमती भागातील लंगटांग लिरूंग हिमनगाचा एक मोठा तुकडा त्रिशुली नदीच्या पात्रात पडला. त्यामुळे विनाशकारी महापूर आला. पाणी, ढिगारा आणि दगडांमुळे पाण्याला अटकाव झाला. पाण्याचा दबाव वाढताच मोठी आपत्ती कोसळली. महापूरात काडी कचऱ्याप्रमाणे गावं, शाळा, हॉटेल वाहून गेल्या. या भीषण नैसर्गिक संकटात एक चमत्कार घटना समोर आली. नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील देवीघाट परिसरातील घराची जगभरात चर्चा झाली. सर्व बाजूने काळेकुट्ट महापूराचे पाणी, चिखल, दगड आणि पुराच्या पाण्याचे तडाखे बसत असताना हे घर ऐटीत उभे होते. या हिरव्या रंगाच्या घराने महापूराचा माज उतरवला. प्रकाश पांडे प्याकुरले यांच्या या इमारतीच्या मजबुतीची चर्चा सुरू झाली.

महापूरात का वाहून गेले नाही घर?

घर मालक प्रकाश पांडे प्याकुरले यांनी याविषयीची माहिती दिली. हिमालयाच्या कुशीत असल्याने थंड हवामान असते. त्यामुळे घराचे बांधकाम हे उष्णतारोधक असते तर उभा भार पेलू शकणार्‍या तंत्राचा आणि संरचनेला प्राधान्य देण्यात येते. त्यांच्या पूर्वजांनी अगोदरच त्रिशुली नदीच्या भौगोलिक आणि पूराचा धोका ओळखला होता. त्यामुळे घर तयार करतेवेळी त्यांनी जमिनीखाली दोन मजल्या इतके खोदकाम केले. पाया खोदला. तिथे त्यांनी मजबूत पाया तयार केला. या मजबूत पायामुळेच त्यांचे घर या भीषण आणि विनाशकारी महापूरात ताठ कण्याने उभे राहिले. ते कोसळले नाही. ढासळले नाही की वाहूनही गेले नाही.

या गोष्टींमुळे महापूरात वाचले घर

कोणतीही इमारत महापूरात अथवा नैसर्गिक आपत्तीत टिकण्यासाठी काही तांत्रिक बाबींचा आणि भौगोलिक कारणांचा विचार करणे गरजेचे आहे. हे हिरवे घर महापूरात टिकण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचा मजबूत पाया (Foundation), त्याचे रेनफोर्स्ड कॉक्रींट, सिमेंट आणि स्टीलचे पिलर फ्रेमवर्क हे आहेत. याशिवाय या घराच्या खाली जे दोन मजले होते. त्याच्या विटा पुराच्या तडाख्यात वाहून गेल्या आणि पाण्याला अटकाव झाला नाही. पाणी आणि मातीचे ढिगारे, दगड वाहून जाऊ शकले. यामुळे घराच्या पिलर्सवरील, खांबावरील ताण अत्यंत कमी झाला. हे घर मुख्य प्रवाहापासून थोडे अंतरावर असल्याने त्याला महापूराचा एकदम फटका बसला नाही.

घर बांधताना काय काळजी घ्याल?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे नदीच्या एकदम काठावर घर बांधू नका. नदीपात्रात अतिक्रमण करू नका. पण नदीच्या शेजारील परिसरात घर बांधताना त्याचा पाया अधिक खोल आणि मजबूत असण्यावर भर द्या. योग्य आणि दर्जेदार साहित्य, सिमेंटचा वापर करा. भूकंपगतिरोधक आणि महापूराचा धोका कमी करणारे स्ट्रक्चर तयार करून घ्या. त्यानुसार घर बांधा. स्ट्रक्चरल ऑडिट जरूर करा. घर बांधताना किती मजले बांधायचे त्यानुसार पाया आणि खांबाची मजबुती ठरवा.

Follow Us
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?