AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत विसरणार नाही…यूएनमध्ये पाकिस्तानला पाडले तोंडावर, भारताने दिली थेट यादीच

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळाला. काहीही झाले तरीही या हल्ल्याचा बदला घ्या अशी भावना नागरिकांमध्ये होती. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. आता भारताने परत एकदा पाकिस्तानला तोंडावर पाडले आहे.

भारत विसरणार नाही...यूएनमध्ये पाकिस्तानला पाडले तोंडावर, भारताने दिली थेट यादीच
India
| Updated on: Sep 11, 2025 | 8:41 AM
Share

मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. मात्र, भारत आणि अमेरिकेत तणाव सुरू असताना पाकिस्तानने अमेरिकेसोबत जवळीकता साधत काही महत्वाचे करार करून घेतले. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामवर मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात फक्त हिंदू पर्यटकांना टार्गेट करण्यात आले. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मदतीने जोरदार उत्तर पाकिस्तानला देत दहशतवादाचे कंबरडे मोडले. मात्र, भारत आणि पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीच युद्धाची गंभीर स्थिती निर्माण झाली.

संयुक्त राष्ट्र मंचावर भारताचा पाकिस्तान विरोधात संताप 

आता परत एकदा संयुक्त राष्ट्र मंचावर भारताने पाकिस्तानला जोरदार खडेबोल सुनावले आहेत. भारताने स्पष्ट सांगितले की, दहशतवादाच्या प्रायोजकांकडून धडे घेण्याची अजिबात गरज नाही. मानवाधिकार परिषदेच्या मिटिंगमध्ये भारताने पहलगाम हल्ल्यापासून ते मुंबई हल्ल्यापर्यंत पूर्ण यादीच वाचून दाखवली. भारताचे स्थायी मिशन काऊंसलर क्षितीज त्यागी यांनी मानवाधिकार परिषदेच्या 60 व्या सत्रात पाकिस्तानची चांगलीच कानउघडणी केलीये.

भारत विसरला नसल्याचे सांगून थेट सुनावले खडेबोल

क्षितीज त्यागी यांनी म्हटले की, आम्ही त्या देशाला उत्तर देण्यासाठी परत एकदा तयार आहोत. त्यांनी ठणकावून सांगितले की, भारत 9\11 ला विसरला नाहीये. यावेळी त्यांनी ओसामा बिन लादेनबद्दल बोलताना म्हटले की, पाकिस्तानमध्ये त्याला मारले गेले. उरी, पुलवामा, पठाणकोट, मुंबई याला भारत विसरला नाहीये. मुळात म्हणजे आम्हाला दहशतवाद्यांकडून कोणतेही धडे अजिबातच नाही पाहिजेत. भारताने आपला संताप या परिषदेमध्ये व्यक्त केला.

पहलगाम हल्ल्यानंतर लोकांमध्ये मोठा संताप 

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला. लोकांमध्ये प्रचंड संताप दिसला. पहलगामच्या हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. यावेळी दहशतवादी पर्यटकांना कशाप्रकारे मारत होते हे काही व्हिडीओमध्ये दिसत होते. भारताने पाकिस्तानच्या विरोधात थेट ऑपरेशन सिंदूर राबवले. मात्र, यादरम्यान युद्ध स्थिती निर्माण झाली. आता पाकिस्तान हा अमेरिकेला हाताला धरून भारताला त्रास देतान दिसतोय. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटीही मान्य केल्या नाहीत.

Follow Us
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.