जग बघतच राहिले, भारताने करून दाखवले, होर्मुज खाडीत भारताचा मोठा दणका, थेट सरकारने..
इराण अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कोणत्याही क्षणी इराणवर मोठा हल्ला होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. हल्ल्याबाबत घडामोडींनाही वेग आला. त्यामध्येच आता भारताकडून जगाची झोप उडवणारा निर्णय घेण्यात आला.

इराण आणि अमेरिका युद्धात संपूर्ण जग संकटात आहे. होर्मुज खाडी गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बंद आहे. अनेक देशांमध्ये कच्च्या तेलाचे संकट बघायला मिळतंय. भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली. चार वर्षापासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले नाही. मात्र, त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. पाच दिवसांमध्ये दोनदा या किमती वाढवण्यात आल्या. इराण आणि अमेरिका युद्धाचा भारताला थेटपणे फटका बसत आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. तेलाच्या किमती जवळपास 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारताच्या शेजारी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सतत वाढ होतंय. एलपीजी गॅसची देखील मोठी समस्या आहे. यादरम्यानच भारताने मोठी कामगिरी केली. भारताने असे काही केले की, जगातील एकाही देशाला हे करता आले नाही.
भारताने असे काही केले की, पूर्ण जग फक्त पाहतच राहिले. भारताने थेट होर्मुज खाडीतून आपले जहाज पाठवले. इराण आणि अमेरिका यांच्या धमक्यांना भीक न घातला होर्मुज खाडीतून आपले जहाज पाठवले. होर्मुज खाडीत आता फक्त इराणच नाही तर अमेरिकेचीही नाकेबंदी आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सरकारी मालकीच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पर्शियन आखाताकडे जाण्यासाठी निघाले.
भारतीय नौदल आणि तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या मंजुरीची वाट पाहत आहेत. हे टँकर तेल गोळा करण्यासाठी मध्य पूर्वेतील तेल पुरवठादार देशांकडे प्रवास करणार आहेत. संबंधित सूत्रांच्या हवाल्याने ब्लूमबर्गने वृत्त दिले आहे की, इराण अमेरिका-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून हा अशाप्रकारचा पहिलाच निर्णय आहे. सरकारकडून अंतिम मंजुरी मिळताच भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दिशेने प्रवास सुरू करतील.
होर्मुज खाडी बंद असताना भारताकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. हेच नाही तर काही जहाजही होर्मुज खाडीतून भारताचे जोडले जात आहेत. होर्मुज खाडीत भारतीय जहाज अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत. भारतात कच्च्या तेलाची कोणतीही कमी होऊ नये, याकरिता भारताकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत.
