AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने फाडला पाकिस्तानचा बुरखा, थेट म्हटले, तुम्ही तुमच्या लोकांवर बॉम्ब टाकता, आमच्या..

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिले आहेत. त्यामध्येच आता भारताने पाकिस्तानला मोठा दणका दिला. ज्याने एकच खळबळ उडाली. जागतिक मंचावर भारताने पाकिस्तानला पळता भुई कमी केली.

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने फाडला पाकिस्तानचा बुरखा, थेट म्हटले, तुम्ही तुमच्या लोकांवर बॉम्ब टाकता, आमच्या..
United Nations Council
| Updated on: May 21, 2026 | 8:57 AM
Share

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर हल्लाबोल केला. पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यात चांगलेच फटकारले आहे. भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. भारताने विचारलेल्या प्रश्नांवर साधे उत्तरही पाकिस्तानला देता आले नाही. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा आवाज दाबला. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका करत त्यांना पळता भुई कमी केली. पाकिस्तानला खडेबोल सुनावत त्यांनी म्हटले की, नरसंहार आणि हिंसाचाराचा इतिहास असलेल्या देशाला भारताच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. पी. हरीश ज्या पद्धतीने बोलले, त्यावर पाकिस्तान साधे उत्तरही देऊ शकला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध कायमच तणावात राहिली. त्यामध्येच पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर स्थिती अधिकच गंभीर झाली. भारताने पाकिस्तानला एका मागून एक मोठे दणके दिले आहेत. ज्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले.

संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये भारताने युनामाच्या एका अहवालाचा हवाला दिला. ज्यानुसार 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांत पाकिस्तानी लष्कराच्या सीमापार कारवाया आणि हवाई हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानमध्ये 750 नागरिक ठार आणि जखमी झाले. युनामाच्या मते, या 95 घटनांपैकी 94 घटनांसाठी पाकिस्तानी सुरक्षा दल जबाबदार होते. ज्यानंतर भारताने थेट पाकिस्तानवर हल्ला चढवला.

हेच नाही तर संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलताना पी. हरीश यांनी थेट म्हटले की, अरे तुम्ही तुमच्याच लोकांवर बॉम्ब टाकतात. तुम्ही आमच्याबद्दल काय बोलता? पाकिस्तानने ऐन रमजान महिन्यात मोठी कारवाई अफगाणिस्तानवर केली. ज्यामध्ये अनेक लोकांचा जीव गेला. थेट रूग्णालयावरही हल्ला पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केला. ज्यावरूनही भारताने पाकिस्तानचा क्लास लावला.

जागतिक मंचावर पाकिस्तानला भारताने तोंडावर पाडले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. सतत मोठे हल्ले केले जात आहेत. अफगाणिस्तानला भारत मदत करत असल्याचा मोठा आरोप करण्यात आला. मात्र, भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले. पाकिस्तानमध्ये सध्या स्थिती गंभीर आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल