AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan Relations : पाकिस्तान घासतोय भारतापुढे नाक, मैत्री करण्यास उतावीळ, बांगलादेशातील एका फोटोच्या आधारे मोठा दावा!

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. असे असतानाच आता भारत बांगलादेशातील एका फोटोची मदत घेत भारतासोबत मैत्री करण्यास उतावीळ झाला आहे.

India Pakistan Relations : पाकिस्तान घासतोय भारतापुढे नाक, मैत्री करण्यास उतावीळ, बांगलादेशातील एका फोटोच्या आधारे मोठा दावा!
s jaishankar and sardar ayaz sadiqImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 01, 2026 | 3:05 PM
Share

India Pakistan Relations : पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामध्ये हल्ला केल्याच्या घटनेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगलेच ताणलेले आहेत. भारत सध्या पाकिस्तानविरोधात कोणत्याही प्रकारचा व्यापर करत नाही. सोबतच पाकिस्तानने भविष्यात कोणतीही आगळीक केली तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ, असे भारताने खडसाऊन सांगितलेले आहे. पाकिस्तान मात्र भारतासोबत मैत्रीसंबंध नव्याने वाढवण्यासाठी फारच उतावीळ झालेला आहे. भारताचे परराष्ट्रममंत्री एस. जयशंकर बांगलादेशमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन केले. याच एका कृतीचा आधार घेऊन पाकिस्तानला भारतासोबत मैत्री करण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. भारताने मात्र या हस्तांदोलनानंतर आपली भूमिका स्पष्ट करून पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आहे. पाकिस्तानला भारताने पुन्हा उघडे पाडले आहे.

नेमकं काय घडलं?

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या अंत्यसंस्काराला गेले होते. यावेळी पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक हेदेखील बांगलादेशमध्ये पोहोचले होते. यावेळी सरदार अयाज सादिक आणि एस जयशंकर यांच्यात काही वेळेसाठी भेट झाली. दोघांनीही हस्तांदोलन केले. परंतु याच हस्तांदोलन आणि भेटीची मदत घेत पाकिस्तानने अनेक मोठे दावे केले आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबली सचिवालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सादिक जिया शोक पुस्तिकेत शोक संदेश लिहिण्यासाठी गेले होते. त्यावेळी एस जयशंकर उपस्थित होते. एस जयशंकर यांनी सादिक यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भारताचे इतरही काही प्रतिनिधी होते, असे या सचिवालयाने म्हटले आहे.

 भारताने काय स्पष्टीकरण दिले

सोतबच 2025 सालातील पहलगाम घटनेनंतर ही पहिलीच महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय भेट होती. पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याच्या चौकशीसाठी संवाद आणि सहयोगाच्या भूमिकेवरच जोर दिलेला आहे, असेही सचिवालयाने स्पष्ट केले. भारताने मात्र ही भेट फक्त शिष्टाचाराचा एक भाग होती. बांगलादेशात सगळीकडे शोकस्थिती लक्षात घेऊन सर्व शिष्टाचारांचे पालन करण्यात आले, असे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यतील संबंध या भेटीनंतर सुरळीत होणार की आहे तशीच स्थिती कायम राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच दादांना तुरुंगात टाकणार होते
उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच दादांना तुरुंगात टाकणार होते.
पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार?
पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार?.
आता धर्मदाय रुग्णालयांसाठी नवीन नियम! फडणवीसांनी दिली माहिती
आता धर्मदाय रुग्णालयांसाठी नवीन नियम! फडणवीसांनी दिली माहिती.
झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचे आंदोलन
झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचे आंदोलन.
भाजप पक्ष नाही, छळ छावणी! त्याचे बळी दादा; संजय राऊतांची विखारी टीका
भाजप पक्ष नाही, छळ छावणी! त्याचे बळी दादा; संजय राऊतांची विखारी टीका.
अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल.
अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान
अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान.
कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल
कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल.
छप्पर उडालं, संसार उघड्यावर आले! महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेना
छप्पर उडालं, संसार उघड्यावर आले! महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेना.
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू.