AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan Relations : पाकिस्तान घासतोय भारतापुढे नाक, मैत्री करण्यास उतावीळ, बांगलादेशातील एका फोटोच्या आधारे मोठा दावा!

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. असे असतानाच आता भारत बांगलादेशातील एका फोटोची मदत घेत भारतासोबत मैत्री करण्यास उतावीळ झाला आहे.

India Pakistan Relations : पाकिस्तान घासतोय भारतापुढे नाक, मैत्री करण्यास उतावीळ, बांगलादेशातील एका फोटोच्या आधारे मोठा दावा!
s jaishankar and sardar ayaz sadiqImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 01, 2026 | 3:05 PM
Share

India Pakistan Relations : पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामध्ये हल्ला केल्याच्या घटनेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगलेच ताणलेले आहेत. भारत सध्या पाकिस्तानविरोधात कोणत्याही प्रकारचा व्यापर करत नाही. सोबतच पाकिस्तानने भविष्यात कोणतीही आगळीक केली तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ, असे भारताने खडसाऊन सांगितलेले आहे. पाकिस्तान मात्र भारतासोबत मैत्रीसंबंध नव्याने वाढवण्यासाठी फारच उतावीळ झालेला आहे. भारताचे परराष्ट्रममंत्री एस. जयशंकर बांगलादेशमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन केले. याच एका कृतीचा आधार घेऊन पाकिस्तानला भारतासोबत मैत्री करण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. भारताने मात्र या हस्तांदोलनानंतर आपली भूमिका स्पष्ट करून पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आहे. पाकिस्तानला भारताने पुन्हा उघडे पाडले आहे.

नेमकं काय घडलं?

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या अंत्यसंस्काराला गेले होते. यावेळी पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक हेदेखील बांगलादेशमध्ये पोहोचले होते. यावेळी सरदार अयाज सादिक आणि एस जयशंकर यांच्यात काही वेळेसाठी भेट झाली. दोघांनीही हस्तांदोलन केले. परंतु याच हस्तांदोलन आणि भेटीची मदत घेत पाकिस्तानने अनेक मोठे दावे केले आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबली सचिवालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सादिक जिया शोक पुस्तिकेत शोक संदेश लिहिण्यासाठी गेले होते. त्यावेळी एस जयशंकर उपस्थित होते. एस जयशंकर यांनी सादिक यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भारताचे इतरही काही प्रतिनिधी होते, असे या सचिवालयाने म्हटले आहे.

 भारताने काय स्पष्टीकरण दिले

सोतबच 2025 सालातील पहलगाम घटनेनंतर ही पहिलीच महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय भेट होती. पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याच्या चौकशीसाठी संवाद आणि सहयोगाच्या भूमिकेवरच जोर दिलेला आहे, असेही सचिवालयाने स्पष्ट केले. भारताने मात्र ही भेट फक्त शिष्टाचाराचा एक भाग होती. बांगलादेशात सगळीकडे शोकस्थिती लक्षात घेऊन सर्व शिष्टाचारांचे पालन करण्यात आले, असे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यतील संबंध या भेटीनंतर सुरळीत होणार की आहे तशीच स्थिती कायम राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.