AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan Relations : पाकिस्तान घासतोय भारतापुढे नाक, मैत्री करण्यास उतावीळ, बांगलादेशातील एका फोटोच्या आधारे मोठा दावा!

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. असे असतानाच आता भारत बांगलादेशातील एका फोटोची मदत घेत भारतासोबत मैत्री करण्यास उतावीळ झाला आहे.

India Pakistan Relations : पाकिस्तान घासतोय भारतापुढे नाक, मैत्री करण्यास उतावीळ, बांगलादेशातील एका फोटोच्या आधारे मोठा दावा!
s jaishankar and sardar ayaz sadiqImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 01, 2026 | 3:05 PM
Share

India Pakistan Relations : पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामध्ये हल्ला केल्याच्या घटनेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगलेच ताणलेले आहेत. भारत सध्या पाकिस्तानविरोधात कोणत्याही प्रकारचा व्यापर करत नाही. सोबतच पाकिस्तानने भविष्यात कोणतीही आगळीक केली तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ, असे भारताने खडसाऊन सांगितलेले आहे. पाकिस्तान मात्र भारतासोबत मैत्रीसंबंध नव्याने वाढवण्यासाठी फारच उतावीळ झालेला आहे. भारताचे परराष्ट्रममंत्री एस. जयशंकर बांगलादेशमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन केले. याच एका कृतीचा आधार घेऊन पाकिस्तानला भारतासोबत मैत्री करण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. भारताने मात्र या हस्तांदोलनानंतर आपली भूमिका स्पष्ट करून पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आहे. पाकिस्तानला भारताने पुन्हा उघडे पाडले आहे.

नेमकं काय घडलं?

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या अंत्यसंस्काराला गेले होते. यावेळी पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक हेदेखील बांगलादेशमध्ये पोहोचले होते. यावेळी सरदार अयाज सादिक आणि एस जयशंकर यांच्यात काही वेळेसाठी भेट झाली. दोघांनीही हस्तांदोलन केले. परंतु याच हस्तांदोलन आणि भेटीची मदत घेत पाकिस्तानने अनेक मोठे दावे केले आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबली सचिवालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सादिक जिया शोक पुस्तिकेत शोक संदेश लिहिण्यासाठी गेले होते. त्यावेळी एस जयशंकर उपस्थित होते. एस जयशंकर यांनी सादिक यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भारताचे इतरही काही प्रतिनिधी होते, असे या सचिवालयाने म्हटले आहे.

 भारताने काय स्पष्टीकरण दिले

सोतबच 2025 सालातील पहलगाम घटनेनंतर ही पहिलीच महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय भेट होती. पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याच्या चौकशीसाठी संवाद आणि सहयोगाच्या भूमिकेवरच जोर दिलेला आहे, असेही सचिवालयाने स्पष्ट केले. भारताने मात्र ही भेट फक्त शिष्टाचाराचा एक भाग होती. बांगलादेशात सगळीकडे शोकस्थिती लक्षात घेऊन सर्व शिष्टाचारांचे पालन करण्यात आले, असे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यतील संबंध या भेटीनंतर सुरळीत होणार की आहे तशीच स्थिती कायम राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत