AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शत्रूही करणार नाही असे काम अमेरिकेने भारतासोबत केले, थेट दणका, चाबदार बंदरावर…

अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका अनेक देशांना बसत आहे. त्यामध्येच आता इराण आणि अमेरिका युद्धात भारतासाठी एक अत्यंत वाईट बातमी पुढे येताना दिसत आहे. भारताला ज्याची प्रचंड भीती होती, अखेर तेच घडले आहे.

शत्रूही करणार नाही असे काम अमेरिकेने भारतासोबत केले, थेट दणका, चाबदार बंदरावर...
Chabahar port attack
| Updated on: Mar 16, 2026 | 1:32 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. या युद्धात सर्वात जास्त धक्का आणि नुकसान इराणचे होईल, असे सुरूवातीला वाटत होते. मात्र, आता सर्व डाव उलटा पडला असून थेट अमेरिकाच कोंडीत सापडली आहे. अमेरिकेला या युद्धात धक्का बसला. होर्मुज खाडी काही देशांकरिता इराणकडून बंद करण्यात आली, यामुळे जग संकटात आहे. अमेरिकेने अनेक प्रयत्न करूनही इराण काही मागे हटण्याचे नाव घेत नाही. धमक्यांचाही काहीच असर इराणवर होत नाही. उलट इराण अधिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता अमेरिकेने काही देशांची मदत मागितली. मात्र, एकही देश पुढे आला नाही. मागे आड पुढे विहिर अशी स्थिती अमेरिकेची झाली. मागे हटणेही शक्य नाही आणि पुढे जाता पण येत नाही. अशातच आता अमेरिकेकडून धक्कादायक निर्णय घेतला, ज्याचा थेट फटका भारताला बसताना दिसत आहे.

चाबहार बंदर भारतासाठी खूप महत्वाचे आहे. कारण पाकिस्तानला सरळ बायपास करुन अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत थेट व्यापाराची संधी उपलब्ध होते. भारताने 2003 साली या प्रोजेक्टचा प्रस्ताव दिला. इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरच्या माध्यमातून क्षेत्रीय कनेक्टिविटी मजबूत व्हावी हा त्यामागे उद्देश होता. भारताने 2024 च्या अर्थसंकल्पात चाबहार बंदराकरिता मोठा निधीही दिली. चाबहार बंदर भारतासाठी महत्वाचे असतानाच आता अमेरिकेने थेट चाबहार बंदराला टार्गेट केले.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडून चाबहार बंदरावर मोठा हल्ला करण्यात आला. अमेरिकेच्या लढाऊ विमानांकडून चाबदार बंदरातील सैन्य ठिकाणांना निशाणा बनवण्यात आले. मोठे धमक्यांचे आवाज आले. धमक्यांच्या आवाजांनंतर धुराचे लोटही हवेत दिसत होते. ज्यामुळे चाबहार बंदरावर मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओही याबद्दलची व्हायरल झाली आहेत.

होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने अमेरिका भडकली आहे. कोणत्याही पद्धतीने अमेरिकेला हा मार्ग सुरू करायचा आहे. कारण होर्मुज मार्ग बंद असल्याने कच्च्या तेलाची निर्यात आणि आयात पूर्णपणे थांबली आहे. होर्मुज मार्ग बंद असला तरीही भारताचे जहाज इराणकडून सुरक्षित काढले जात आहेत. यामध्येच आता अमेरिकेने थेट चाबहार बंदराला टार्गेट केले आहे. चाबहार बंदराचा विकास भारताकडून करण्यात आला.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!