AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज खाडीत भारतीय जहाजावर हल्ला, भारत सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठा कहर सुरू आहे. होर्मुज खाडी गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बंद आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा होर्मुज खाडीत तणाव वाढल्याचे बघायला मिळत आहे. स्थिती अधिक गंभीर होत आहे. यादरम्यानच भारत सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला.

होर्मुज खाडीत भारतीय जहाजावर हल्ला, भारत सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, थेट..
Attack on Indian ship
| Updated on: May 10, 2026 | 8:52 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाला 2 महिने होऊनही या देशांमधील युद्ध काही थांबत नाहीये. या युद्धामुळे जग संकटात आहे. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे भयंकर संकट आहे. युद्ध थांबावे, ही जगाची इच्छा आहे. मात्र, अमेरिका आणि इराण दोन्ही देश मागे हटत नाहीत. त्यामध्येच अमेरिकेने होर्मुज खाडीत मोठी नाकेबंदी केली. अमेरिकेच्या या नाकेबंदीनंतर इराणी बंदराहून एकही जहाज बाहेर पडू शकत नाही. अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही अशा धक्कादायक पद्धतीने इराण उभा आहे. जास्तीत जास्त इराण अमेरिका युद्ध एक महिना चालेल असा अंदाज अमेरिकेचा होता आणि तिथेच अमेरिका चुकली. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला पण युद्ध काही थांबत नाही. या युद्धात एकही देश अमेरिकेच्या बाजूने उभा नाही. अमेरिकेलाही या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे.

होर्मुज खाडी अधिक धोकादायक बनली आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली तर दुसरीकडे अमेरिकेनेही नाकेबंदी केली. होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये पुन्हा एकदा क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले होत आहेत. एका चिनी जहाजावर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच भारतीय जहाजावरही मोठा हल्ला झाला. 18 खलाशी असलेल्या जहाजावर हल्ला करत त्याला समुद्रात बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हा हल्ला नक्की इराणकडून करण्यात आला की, अमेरिकेकडून याबाबत अधिक माहिती मिळू शकत नाहीये. दोन्ही देश नेहमीप्रमाणे हातवर करत आहेत. मात्र, हा भारतासाठी मोठा दणका म्हणावा लागेल. अनेक भारतीय जहाज अजूनही होर्मुज खाडीत अडकून आहेत. आता थेट भारतीय जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात 1 भारतीय खलाशी ठार झाला. या घटनेनंतर भारत सरकार अॅक्शन मोडवर आले.

भारत सरकारमधील प्रमुख अधिकारी जहाज मालकाच्या संपर्कात आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेत मृत खलाशीचा मृतदेह सन्मानाने मायदेशी परत आणला जाईल, याकरिता भारत सरकारकडून प्रयत्न केली जात आहेत. भारत सरकार अॅक्शन मोडवर आहे. या हल्ल्याची जबाबदारी इराण किंवा अमेरिका यांच्याकडून घेण्यात आली नाही.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत