AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय असल्यामुळेच वाचलो… शेवटी कलमा वाचत होतो पण एक हिंदुस्थानी असल्याने.. व्लॉगरने सांगितली 12 दिवसांची…

अमेरिका आणि इराण युद्धात स्थिती भयंकर आहे. हजारो लोकांच्या जीवन धोक्यात आहेत. हजाराच्या घरात या युद्धात लोकांचे जीव गेले. इराणमधील परिस्थिती अत्यंत बिकड आहे. एक भारतीय असल्याने आपण इराणमध्ये कसे वाचलो हे सांगताना एक भारतीय व्लॉगर दिसला आहे.

भारतीय असल्यामुळेच वाचलो... शेवटी कलमा वाचत होतो पण एक हिंदुस्थानी असल्याने.. व्लॉगरने सांगितली 12 दिवसांची...
Umar Iqbal
| Updated on: Mar 31, 2026 | 8:37 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाला 1 महिना पूर्ण झाला. या काळात मोठे नुकसान झाले. अनेक लोक या युद्धात ठार झाले. युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. इराणवर मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. मात्र, तरीही इराण हार मानत नाही. इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आल्याने जगाची झोप उडाली. इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना पूर्ण झाला. तेथील परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. इराणमध्ये असलेले भारतीय लोक सुरक्षित आहेत. जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी असलेल्या उमर इक्बाल याने युद्धाच्या काळात इराणमध्ये 12 दिवस घालवले, तो एक व्लॉगर आहे. त्याने अफगाणिस्तानपासून इराणपर्यंतचा प्रदेश फिरला. यावेळी त्याने न्यूज 18 सोबत बोलताना यादरम्यानचे आपले सर्व अनुभव सांगितले. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की, मी भारतीय असल्याने येथे जिवंत आहे.

उमर इक्बाल याने म्हटले की, काही वेळ अशी आली की, मला वाटले की, माझ्या आयुष्याचा शेवटचा क्षण आला. मी कोणत्याही क्षणी ठार होणार असल्याचे कळाल्यावर मी शेवटचा कलमा वाचत होतो. आजूबाजुला मिसाईल पडत होते. मी एक भारतीय व्यक्ती असल्याने मला इराणच्या सुरक्षारक्षकांनी आणि नागरिकांनी मोठी मदत केली. लवकरात लवकर येथील परिस्थिती नियंत्रणात यावी, अशी अपेक्षा करतो.

इक्बाल हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात इराणमध्ये पोहोचला होता. तो व्लॉगर असून तो आपल्या व्लॉगिंग करिता इराणमध्ये गेला होता. त्यानंतर युद्धाला सुरूवात झाली. 12 दिवसांच्या व्हिसावर आपण इराणमध्ये आलो होतो. त्यानंतर इराणच्या दूतावासाने व्हिसा देण्यास नकार दिली. त्यानंतर अनेक प्रयत्नानंतर मला 12 दिवसानंतरचा व्हिसा मिळाला. यासोबतच लवकरात लवकर देश सोडण्याचा इशाराही दिला.

2 मार्चला मोठा हल्ला झाला. मी तिथेच होतो, त्यानंतर मी बचावकार्यात सहभागी झालो आणि मीही थोडा जखमी झालो. त्याने पुढे बोलताना म्हटले की, 6 मार्च रोजी त्याने तैबादच्या दिशेने सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास केला. वाटेत भीती आणि अनिश्चितता कायम होती. 7 मार्च रोजी अफगाण सीमा ओलांडून हेरातला पोहोचल्यावर त्यांना आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला. पण एक भारतीय असल्यानेच आपण जिवंत असल्याचे वारंवार सांगताना इक्बाल दिसला.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.