AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्यानमारमधील सैन्य कारवाईने भारताची काळजी वाढली, 100 पेक्षा अधिक लोकांची घुसखोरी

हिसेंत होरपळत असलेल्या म्यानमारमधून जवळपास 100 पेक्षा अधिक लोक म्यानमारमधून पळून येत भारताच्या ईशान्य भागात घुसल्याचं बोललं जातंय.

म्यानमारमधील सैन्य कारवाईने भारताची काळजी वाढली, 100 पेक्षा अधिक लोकांची घुसखोरी
| Updated on: Mar 15, 2021 | 2:05 AM
Share

नेप्यिडॉ : म्यानमारमध्ये तयार झालेल्या राजकीय संकटामुळे भारताची काळजी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिसेंत होरपळत असलेल्या म्यानमारमधून जवळपास 100 पेक्षा अधिक लोक म्यानमारमधून पळून येत भारताच्या ईशान्य भागात घुसल्याचं बोललं जातंय. याबाबत या भागातील एका गावातील स्थानिक नेत्यानेच ही माहिती दिलीय. यापूर्वीही सैन्य उठावानंतर म्यानमारमधून लोक भारतात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत (Infiltration of More than 100 citizen of Myanmar in India after Military action and violence) .

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिझोराम राज्यातील परक्वान गावातील काउंसिलचे अध्यक्ष रामलियानी यांनी दुजोरा दिलाय. रामलियानी म्हणाले, “आत्तापर्यंत 116 नागरिकांनी तियु नदी ओलांडून भारतात प्रवेश केलाय. हे लोक ज्या रस्त्याने म्यानमारमधून भारतातील परक्कान गावात आले तेथे आसाम रायफलचे सैन्य तैनात नसल्याचंही सांगितलं जातंय.

म्यानमार पोलीस आणि अग्निशामक विभागाचा सहभाग

आत्तापर्यंत स्थानिक नेत्यांच्या या माहितीवर सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. रामलियाना यांना या म्यानमारच्या लोकांनी भारतात प्रवेश कधी केला हे सांगता आलेलं नाहीये. काही स्थानिक पत्रकारांनी दावा केलाय की, यात म्यानमार पोलीस आणि अग्निशामक विभागाचा सहभाग आहे. ग्रहमंत्रालयाकडून या मुद्द्यावर मागील हप्त्यात मिझोरम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या 4 राज्यांना सूचना देण्यात आल्यात. यानुसार निर्वासितांना भारतात घुसण्यापासून आडवण्यासाठी योग्य पावले उचलावीत.

या चारही राज्यांच्या सिमा म्यानमारला लागून आहेत. भारताने म्यानमारच्या 7 पोलीस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. जे भारतीय सीमेत आले होते. त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना दिलेल्या माहिती प्रमाणे तेथील सैन्याच्या मागे लागले होते कारण हे त्यांच्या सूचनांचे पालन करत नव्हते.

हेही वाचा :

Myanmar : आधी 19 वर्षांच्या मुलीची डोक्यात गोळी झाडून हत्या, नंतर रात्री अंधारात मृतदेह उकरुन सिमेंट भरलं

आंग सान सू की यांच्यावर म्यानमार सैन्याकडून सर्वात मोठा आरोप, 11 किलो सोनं आणि कोट्यावधींच्या लाचेचा दावा

Special Story | म्यानमारमध्ये लोकशाहीला सुरुंग! लष्कराचा उठाव, भारतावर काय परिणाम?

व्हिडीओ पाहा :

Infiltration of More than 100 citizen of Myanmar in India after Military action and violence

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.