पाकिस्तानच्या प्रस्तावाला इराणकडून केराची टोपली, इराण म्हणाले, युद्ध थांबण्याची मागणी योग्य, पण….
पाकिस्तानने अमेरिका आणि इराणच्या दरम्यान सुरु असलेले युद्धात तोडगा निघावा म्हणून चर्चेसाठी मध्यस्थी करण्याचा दावा केला होता.मात्र, इराणने या मध्यस्थीला संपूर्णपण अमान्य करत युद्धबंदीचा प्रस्ताव ठोकरला आहे.

इराण युद्ध सुरु होऊन महिना पूर्ण झाला आहे. तरीही हे युद्ध थांबण्याचा कोणताही आशेचा किरण दिसत नाही. त्यात आता आपला शेजारी पाकिस्तान इराण युद्ध थांबण्यासाठी दोन्ही देशात चर्चा घडवून युद्धावर सन्मानजन्य तोडगा काढायचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पाकिस्तान या चर्चेचे यजमान पद भूषवण्यास तयार होता. मात्र, आता पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावत इराणने अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा करण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे युद्धाची कोंडी वाढली असून आता अमेरिका यावर काय करते याकडे लक्ष लागले आहे.
पाकिस्तानने अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु झालेल्या युद्धाला समाप्त करण्यासाठी थेट बोलणी व्हावीत यासाठी पुढाकार घेतला होता. परंतू पाकिस्तानच्या या प्रस्तावाला इराणने कोणताही प्रतिसाद न देता तो साफ फेटाळला आहे. त्यामुळे युद्ध थांबण्यासाठी पाकिस्तानची शिष्टाई निष्फळ ठरल्यात जमा झाली आहे. यामुळे पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय मंचावर कोणी भाव देत नाही हे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत इराणचे महावाणिज्य दुतावासाने सोमवारी म्हटले आहे की अमेरिकेसोबत कोणतीही थेट बोलणी झालेली नाहीत. केवळ मध्यस्थांद्वारे खूप जास्त आणि अर्थहीन मागण्या पाठवल्या गेल्या आहेत.
इराणने ठोकरला पाकिस्तानचा प्रस्ताव
इराणच्या मुंबईतील दुतावासातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सोमवारी सांगितले की अमेरिकेसोबत कोणतीही थेट बोलणी झालेली नाहीत. केवल मधल्या दलालांद्वारे खूप जास्त आणि अर्थहीन मागण्या पाठवण्यात आल्या आहेत. अमेरिकेचे धोरण सतत बदलत असते, परंतू आमचा निर्धार ठाम आहे असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
इराणच्या मंत्र्याने पुढे म्हटले आहे की पाकिस्तानचे व्यासपीठ त्यांचे स्वत:चे आहे. आम्ही त्यात भाग घेतला नाही. युद्ध संपवण्याच्या क्षेत्रिय अपिलांचे स्वागत आहे. परंतू हे लक्षात असू दे यास सुरु कोणी केले होते !
