AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला मुस्लीम राष्ट्राचा मोठा धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय; आता हजारो भारतीयांना…

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात तणावची स्थिती आहे. असे असताना आता आणखी एका देशाने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे.

भारताला मुस्लीम राष्ट्राचा मोठा धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय; आता हजारो भारतीयांना...
NARENDRA MODI Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2025 | 6:14 PM
Share

Iran Free Visa Policy : गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. व्यापार तूट भरून काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफसारखे बंधनं लादलेले आहेत. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फस्ट’ या धोरणामुळे भारतासह सर्वच देशांनी खनिज, उद्योग तसेच अन्य बाबींमध्ये कसे स्वयंपूर्ण होता येईल यासह आपापल्या नागरिकांना सुरक्षित कसे करता येईल, त्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न चालू आहेत. अनेक देशांनी अलिकडच्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. असे असतानाच आता भारताला मोठा झटका बसला आहे. मुस्लीन देशाने भारताबाबत आपले धोरण बदलले आहे. त्याचा परिणाम आता भविष्यात दिसणार आहे.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?

मिळालेल्या माहितीनुसार इराण या मुस्लीम राष्ट्राने भारतीयांसाठी मोठ्या निर्णयाची घोषमा केली आहे. या निर्णयानुसार इराणने पासपोर्ट असणाऱ्या भारतीय नागरिकांसाठीची मोफत व्हिसाची सुविधा थांबवली आहे. भारतातून दरवर्षी अनेक लोक इराणमध्ये येतात. त्यांना खोटी आश्वासनं दिली जातात. इराणमध्ये गेल्यानंतर आम्ही तुम्हाला अन्य देशात पाठवू असे सांगितले जाते. त्यानंतर अशा भारतीय नागरिकांची पुढे फसवणूक होते. या फसवणुकीच्या काही घटना समोर आल्या आहेत. हीच बाब लक्षात घेऊन इराणने मोफत व्हिसाची सुविधा थांबवली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत सोमवारी (17 नोव्हेंबर) माहिती दिली आहे.

फसवणूक, खंडणी मागितल्याचे प्रकार समोर

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्यानुसार भारतातील अनेक नागरिकांना खोटी आश्वासने दिली जातात. आम्ही तुम्हाला इराणमार्गे अन्य देशात पाठवू, नोकरी देऊ असे सांगितले जाते. त्यानंतर मात्र अनेक भारतीय नागरिकांसोबत फसवणूक, खंडणी मागितल्याचे प्रकार समोर आले आहेत. भारतीयांना अंधारात ठेवण्याात आले. ही बाब लक्षात घेऊन इराणने व्हिसाबाबत निर्णय घेतल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार इराणी सरकारने भारतातील सामान्य पासपोर्ट धारकांसाठीची व्हिसामधील सूट बंद केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 22 नोव्हेंबर 2025 पासून केली जाईल. इराणच्या मोफत व्हिसा धोरणाचा गुन्हेगारी प्रवृत्तींना फायदा होऊ नये तसेच. या सुविधेचा दुरुपयोग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच तुम्हाला इराणमध्ये कोणी नोकरी देण्याचे आश्वासन देत असेल तर वेळीच खबरदारी घ्या, असे आवाहन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. त्यामुळे आता इराणने मोफत व्हिसा धोरण रद्द केल्यामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत