AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण युद्ध भारत थांबू शकतो, इस्त्रायलचा मोठा दावा, अमेरिका आणि इराणसोबत..

इराणवर 28 फेब्रुवारी 2026 रोजी मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याने खळबळ उडाली. जग या युद्धात होरपळताना दिसले. आता युद्धाबाबत मोठी माहिती पुढे येत असून इस्त्रायलकडून मोठा दावा करण्यात आला.

इराण युद्ध भारत थांबू शकतो, इस्त्रायलचा मोठा दावा, अमेरिका आणि इराणसोबत..
Israeli Ambassador Reuven Azar
| Updated on: Mar 25, 2026 | 10:40 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. शेवटी पाच दिवसांकरिता अमेरिकेकडून युद्धबंदी जाहीर करण्यात आली. युद्ध थांबवण्याकरिता काही देशही पुढे आलीत. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणकडून आम्हाला प्रस्ताव आला आहे. युद्ध थांबवण्याकरिता इराणकडून अटी ठेवण्यात आल्या. जोपर्यंत या अटी पूर्ण होणार नाहीत, तोवर कोणत्याह परिस्थितीत युद्ध थांबवले जाणार नसल्याचे इराणकडून स्पष्ट करण्यात आले. भारताचे या सर्व गोष्टींवर बारीक नजर आहे. इस्त्रायल आणि इराण या दोघांसोबतही भारताचे चांगले संबंध आहेत. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात थेटपणे परिणाम होत आहेत. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा असून कच्च्या तेलाचीही समस्या आहे. यासोबतच तेलाच्या किमती वाढल्याचे मोठा परिणाम होत आहे. होर्मुज खाडीत भारताचे 20 जहाजा अडकून पडली आहेत. युद्धादरम्यान इराणकडून भारताचे जहाज सोडले गेले. भारतात एलपीजी गॅसचा पुरवठा होर्मुज खाडीच्या माध्यमातूनच होतो.

इराण आणि अमेरिका युद्ध थांबावे, अशी जगाची अपेक्षा आहे. यादरम्यानच इराण युद्ध संपवण्यात भारताची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे मोठे विधान दिल्लीतील इस्त्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी केले. रुवेन अझर यांनी म्हटले की, पश्चिम आशियामध्ये भारताचे महत्त्वपूर्ण हितसंबंध आहेत. या युद्धात मध्यस्थ म्हणून पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्तच्या भूमिकेचेही कौतुक केले.

रुवेन अझर यांनी पुढे बोलताना म्हटले की, आपण राजनयिकरणाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आम्ही भारताच्या भूमिकेचे स्वागत करतो. कारण यादरम्यान भारताची भूमिका अनुकूल आहे. पश्चिम आशिया भारताचे संबंध चांगले आहेत आणि तिथे अनेक भारतीय राहतात. भारत एक आर्थिक महासत्ता आहे. पश्चिम आशियामध्ये अनेक सहकार्य प्रकल्प देऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.

हे युद्ध भारत थांबू शकत असल्याचे इस्त्रायलकडून स्पष्ट सांगण्यात आले. सुरूवातीपासूनच या युद्धात भारताची भूमिका महत्वाची राहिली आहे. भारताने दोन्ही देशांना वेळोवेळी संपर्क करून युद्ध थांबवण्याबद्दल चर्चा केली. या युद्धाचा थेटपणे मोठ्या प्रमाणात फटका भारताला बसताना दिसला आहे.

Follow Us
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.