ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..
नेपाळमधून मोठी बातमी पुढे येत आहे. मृतांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. यासोबतच अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचावकार्य राबवले जात आहे. शोध सुरू आहे. मात्र, अनेक भागात मृतदेह तरंगताना दिसत आहेत.

नेपाळमध्ये पुराने हाहाकार माजवला. अनेल लोक बेघर झाली आहेत. बचावकार्य राबवले जात आहे. संकट अजूनही संपले नाही. भारताकडून नेपाळला मोठी मदत केली जात आहे. भारताने नेपाळमध्ये बचावकार्य राबवण्याचाही प्रस्ताव दिला. मात्र, तो प्रस्ताव नेपाळने नाकारला. त्यांना फक्त आर्थिक मदत हवी आहे. अमेरिकेनेही नेपाळला मदत करणार असल्याचे म्हटले. हे संकट संपले नसतानाच नेपाळमध्ये अजून एक संकट उभे आहे. चीनच्या सीमेजवळचा एक बॅरिअर लेक कोसळू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा नेपाळमध्ये महाप्रलय होऊ शकतो, असा इशारा चीनकडून देण्यात आला. नेपाळमध्ये बचावकार्य राबवले जात आहे. काही भारतीय पर्यटकही नेपाळमध्ये अडकली आहेत. या पर्यटकांना सुरक्षित काढण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे.
नेपाळमध्ये या पुरामुळे मोठी हानी झाली. पुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला. 1200 हून लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. भारतातील 290 नागरिकांसोबत संपर्क केला जात आहे. मात्र, या नागरिकांसोबत संपर्क होऊ शकत नाही. अजूनही नेपाळमध्ये पूरस्थिती निर्माण आहे. या महापुरात राज्यातील 114 नागरिक अडकले आहेत.
त्यापैकी 53 नागरिक सुखरूप आहेत. मानसरोवर भागत हे लोक सुरस्थित आहेत. नागपूरचे 106 प्रवासी काठमांडूकडे रवाना झाले आहेत. ग्लेशियरचा खालचा भाग तुटून सुमारे 1200 मीटर खाली दरीत कोसळला असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगितले जातंय. ल्हेंदे खोला नदीत हा भाग कोसळला. नेपाळवरील धोका अजूनही टळला नाही. नेपाळपुढे संकट हे कायम आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसोबत सतत संपर्क केला जात आहे. काही लोक सुरक्षित हॉटेलमध्ये असल्याचाही माहिती मिळतंय. नेपाळमधील विनाशकारी पुरामुळे अनेक कुटुंबे आपल्या कुटुंबापासून दुरावली आहेत. पुरामध्ये बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक रुग्णालये आणि मृतदेह ओळख केंद्राच्या फेऱ्या मारत आहेत. अनेक कुटुंब या पुरामुळे उद्धवस्थ झाली आहेत. त्यातच आता मृतांचा आकडा पुढे आला. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
