AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्यानमारचं चित्र बदललं, लष्कराने 4 वर्षांनंतर आणीबाणी उठवली, 6 महिन्यांत निवडणुका

म्यानमारमध्ये 6 महिन्यात सार्वत्रिक निवडणुका आहेत. यानिमित्ताने तुरुंगात असलेल्या आंग सान सू की यांचे भवितव्य बदलणार का? अशी सध्या चर्चा रंगली आहे. कारण, तेथील लष्कराने 4 वर्षांनंतर आणीबाणी उठवली आहे.

म्यानमारचं चित्र बदललं, लष्कराने 4 वर्षांनंतर आणीबाणी उठवली, 6 महिन्यांत निवडणुका
Myanmar peopleImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 01, 2025 | 6:01 PM
Share

म्यानमारमध्ये 4 वर्षांपूर्वी आंग सान सू यांना अटक झाली होती, हे चित्र अवघ्या जगाच्या डोळ्यासमोर अजूनही आहे. आता दिवस बदलले आहेत, आता म्यानमारची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तेथील लष्कराने तब्बल 4 वर्षानंतर आणीबाणी उठवली असून तुरुंगात असलेल्या आंग सान सू की यांचे भवितव्य बदलणार का? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून आहे. पाहुया याविषयीचा हा रिपोर्ट.

म्यानमारच्या लष्कराने आंग सान सू की यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर चार वर्षांनी आणीबाणी संपुष्टात आणली आहे. जुंटा सरकारने सहा महिन्यांत निवडणुका घेण्यासाठी आयोगाची स्थापना केली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये तत्कालीन कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष यू मिंट स्वी यांनी लष्करप्रमुखांकडे सत्ता सोपवत एक वर्षाची आणीबाणी जाहीर केली होती. त्यानंतर राज्य प्रशासन परिषदेची स्थापना करण्यात आली आणि आणीबाणीला वारंवार सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. 31 जुलै 2025 नंतर आणीबाणी न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्यानमारमध्ये निवडणुका घेण्यासाठी जुंटा राजवटीचे प्रमुख जनरल मिन आंग ह्लाइंग यांच्या नेतृत्वाखाली 11 सदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. सरकारने अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही. मिन आंग ह्लाइंग हंगामी अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे देशाची धुरा सांभाळतील. म्यानमारमध्ये 2021 च्या उठावानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत. या उठावाने म्यानमारला गृहयुद्ध आणि अराजकात ढकलले.

‘निवडणूक फक्त दिखावा’

टीकाकारांनी या निवडणुकीला दिखावा म्हटले असून हा बहिष्कार असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीनंतरही राष्ट्रप्रमुख किंवा सशस्त्र दलप्रमुख म्हणून ह्लाइंग सत्तेत राहतील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बंडखोर गटांनी देशाचा मोठा भाग जुंटाकडून ताब्यात घेतला असताना या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सध्या देशाच्या केवळ एक पंचमांश भागावर जुंटाचे नियंत्रण आहे.

निवडणुकीची घोषणा आणि आयोगाची स्थापना होण्यापूर्वीच लष्कराने एक कायदा संमत केला आहे. या कायद्यानुसार या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांमध्ये अडथळा आणणाऱ्या किंवा विरोध करणाऱ्याला फाशीची शिक्षा होऊ शकते. निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्यासाठी लोकांना संघटित करणे, चिथावणी देणे किंवा विरोध करणे यासाठी तीन ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

सू की यांचे काय होणार?

फेब्रुवारी 2021 मध्ये म्यानमारच्या लष्कराने आंग सान सू की यांचे निवडून आलेले सरकार उलथवून टाकले होते. यानंतर सान स्यू की आणि त्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पक्षाच्या बहुतांश प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. त्यांना वेगवेगळ्या खटल्यांमध्ये 30 वर्षांहून अधिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्या प्रकारे लष्कराने आपल्या देखरेखीखाली निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि कडक कायदे केले आहेत, त्यामुळे सू की यांच्याकडून फारशी आशा नसल्याचे जाणकारांचे मत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.