AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मुस्लीम देशातून येतोय खोऱ्याने पैसा, का पैसे पाठवण्याची वाढली स्पर्धा, भारतीय अर्थव्यवस्थेला किती फायदा ?

जगातील दर सातवा स्थलांतरीत भारतीय असतो असे म्हटले जातात. त्यामुळे भारतीय जगभरात कामधंद्या निमित्ताने पसरलेले आहेत. या भारतीयांनी मायदेशात पाठवलेल्या पैशाने भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदाच होत आहे.

या मुस्लीम देशातून येतोय खोऱ्याने पैसा, का पैसे पाठवण्याची वाढली स्पर्धा, भारतीय अर्थव्यवस्थेला किती फायदा ?
| Updated on: Oct 20, 2025 | 9:47 PM
Share

भारतात विदेशातून दरवर्षी येत असतो पैसा. परदेशात राहणारे भारतीय त्यांच्या नातेवाईकांना पैसे पाठवत असतात. आरबीआयच्या अहवालानुसार २०२४-२५ मध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी १३५ अब्ज डॉलर रेमिटेन्स पाठवले आहेत. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या मुळे IMF आणि जागतिक बँकेने भारताला टॉप रेमिटेन्स रिसिव्हींग नेशनने दर्जा दिलेला आहे. भारतात सर्वात जास्त रेमिटेन्स अमेरिकेतून येतो. या सर्वात एक आकडा आश्चर्यचकीत करणार आहे.

या मुस्लीम देशातून खोऱ्याने येतोय पैसा

भारतात येणाऱ्या रेमिटेन्समध्ये संयुक्त अरब अमिरात (UAE)आणि सौदी अरबचा हिस्सा वाढला आहे. युएई आणि सौदीत अरबमध्ये राहणारे भारतीय मोठ्या प्रमाणात पैसा भारतात पाठवत आहेत. या देशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये मायदेशात सध्या पैसे पाठवण्याची अहमिका लागली आहे.यामागे खरे कारण काय ? वास्तविक भारतीय रुपयाची किंमत युएई दिरहमच्या तुलनेत घसरुन २३.५ रुपये प्रति दिरहमपर्यंत पोहचली आहे. यामुळे NRI याचा फायदा उचलून जास्तीत जास्त रक्कम भारतात पाठवू इच्छीत आहेत.

गल्फ न्यूजच्या बातमीनुसार रुपया जेव्हापासून घसरुन २३.८ रुपये प्रति दिरहमच्या जवळ पोहचला आहे. तेव्हापासून भारतात पैसे पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ते कमी रुपयात जास्त दिरहम पाठवू शकत आहेत. युएई आणि सौदीत राहाणाऱ्या भारतीयांच्या या पावलाने भारतातील त्यांच्या कुटुंबियांना जास्त पैसे मिळत आहे. एप्रिलच्या सुरुवातीनंतर असे पाहायला मिळाले आहे.

मुस्लिम देशातून मनी ट्रान्सफरच्या वेगामागे कारण काय ?

आखाती देशातील करन्सी एक्स्चेंज हाऊसच्या मते जून २०२५ पासून AED मधून INR मधून देवाण घेवाण वाढली आहे. इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांच्या मते ज्यांच्या जवळ थोडे बहुत एक्स्ट्रा पैसे आहेत ते तातडीने भारतात पाठवत आहेत. UAE च्या एका एक्स्चेंज हाऊसच्या सिनीयर अधिकाऱ्यांनी गल्फ न्यूजला सांगितले की अलिकडच्या आठवड्यात AED-INR रेमिटेन्सच्या दृष्टीने चांगला दिवस राहिला. सर्वसाधारणपणे जून महिन्यात एनआरआय भारतीय सुट्ट्या आणि ट्रॅव्हल्सच्या खर्चामुळे भारतात कमी पैसे पाठवायचे.परंतू यंदा रुपया घसरल्याने ट्रेंड बदलला आहे.

रेमिटेन्स म्हणजे काय? भारताला काय फायदा?

जेव्हा परदेशात राहणारे भारतीय नागरिक जेव्हा आपल्या कुटुंबाला भारतात पैसे पाठवतो त्याला रेमिटेन्स म्हटले जाते. या रेमिटेन्समुळे भारतीय अर्थव्यवस्थेला ताकद मिळते. यामुळे देशात डॉलर सारख्या परकीय चलनाचा प्रवाह वाढतो. त्यामुळे भारताची परकीय गंगाजळी मजबूत बनते.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.