AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan War Situation : S-400 बद्दल पाकिस्तानी टीव्हीवर खोट्या बातम्या, सत्य काय ते जाणून घ्या

India Pakistan War Situation : भारताच्या S-400 या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमच पाकिस्तानला उत्तर सापडत नाहीय. म्हणून पाकिस्तानकडून खोटे दावे आणि अपप्रचार सुरु झाला आहे. तिथल्या टीव्हीवर आता खोट्या बातम्या दाखवल्या जात आहत. सत्य, वस्तुस्थिती काय ते जाणून घ्या.

India Pakistan War Situation : S-400 बद्दल पाकिस्तानी टीव्हीवर खोट्या बातम्या, सत्य काय ते जाणून घ्या
S 400Image Credit source: ANI
| Updated on: May 10, 2025 | 1:23 PM
Share

सध्या S-400 मिसाइल सिस्टिम भारताचा अभेद्या सुरक्षा कवच बनली आहे. या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचा प्रत्येक क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ला परतवून लावलाय. या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिममुळेच पाकिस्तानला भारताच काहीही नुकसान करता आलेलं नाही. पाकिस्तानच्या साध्या रॉकेटपासून ते बॅलेस्टिक मिसाइलपर्यंत सर्व हल्ले S-400 ने यशस्वीरित्या परतवून लावले आहेत. त्यामुळे बदल्याच्या आगीत होरपळणाऱ्या पाकिस्तानला काय करावं, ते समजत नाहीय. S-400 मिसाइल डिफेन्स सिस्टिममुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. या मिसाइल सिस्टिमचा सामना कसा करायचा तेच पाकिस्तानला समजत नाहीय.

काल पाकिस्तानने त्यांचं घातक फतेह-1 बॅलेस्टिक मिसाइल भारताच्या दिशेने डागलं. पण भारताने हवेतच पाकिस्तानी मिसाइल नष्ट केलं. चवातळलेला पाकिस्तान मागच्या तीन दिवसांपासून हल्ल्याचा प्रयत्न करतोय. पण भारताची मजबूत मिसाइल डिफेन्स सिस्टिम त्यांचा एक प्रयत्न यशस्वी होऊ देत नाहीय. आता पाकिस्तानी मीडियामध्ये भारताची S-400 मिसाइल सिस्टिम नष्ट केल्याची चर्चा सुरु आहे.

पाकिस्तानच्या दाव्यात किती तथ्य?

आदमपूर येथे असलेली S-400 मिसाइल सिस्टिम नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पण पाकिस्तानकडून ही अफवा पसरवण्यात येत असून हा दावा खोटा आहे. भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. पाकिस्तानच्या हायपरसोनिक मिसाइलने S-400 मिसाइल सिस्टिम उद्धवस्त केल्याच वृत्त पाकिस्तानी PTV ने दिलं होतं. पण ही बातमी चुकीची आणि अफवा पसरवणारी आहे.

S-400 मिसाइल सिस्टिमच वैशिष्ट्य काय आहे?

S-400 मध्ये एकाचवेळी वेगवेगळ्या टार्गेटसना लक्ष्य करण्याची क्षमता आहे. शत्रूची फायटर विमाने, हेलिकॉप्टर, मानवरहीत विमान आणि ड्रोन्सना नष्ट करते.

ही अँटी-बॅलिस्टिक मिसाइल सिस्टिम आवाजाच्या गतीपेक्षा जास्त वेगाने हल्ला करते. या मिसालइल सिस्टिमची रेंज 400 किलोमीटर आहे. 400 किलोमीटर अंतरावरुनच ही सिस्टिम टार्गेट्चा अचूक वेध घेते.

जमिनीवरुन हवेत मारा करणारी ही रशियन मिसाइल प्रणाली 400 किमी अंतरावरील व 30 किमी उंचावरील लक्ष्याला नष्ट करण्यास सक्षम आहे.

शत्रूची मिसाइल किंवा विमानाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी ही क्षेपणास्त्र प्रणाली ते अस्त्र 400 किमी अंतरावर असतानाच नष्ट करु शकते.

भारताच्या या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीने काल रात्री आपली अचूकता आणि क्षमता दाखवून दिली. पाकिस्तानकडून होणारे मिसाइल आणि ड्रोन हल्ले परतवून लावले.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?