AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा ख्वाजा आसिफ चवताळला, भारताबद्दल गरळ ओकली, म्हणाला आता चर्चा नाही, थेट…

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात मोठा संघर्ष चालू आहे. याच संघर्षावर पाकिस्तानने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाकिस्ताने भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

पाकिस्तानचा ख्वाजा आसिफ चवताळला, भारताबद्दल गरळ ओकली, म्हणाला आता चर्चा नाही, थेट...
pakistan and afghanistan war
| Updated on: Oct 18, 2025 | 5:49 PM
Share

Pakistan And Afghanistan War : भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान नेहमीच काहीतरी कुरपाती काडत असते. आता या देशाचे अफगाणिस्तानसोबत युद्ध चालू आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हल्ले केले जात आहेत. तर अफगाणिस्तानदेखील प्रत्युत्तरदाखाल पाकिस्तानवर जोरदार हल्ले करत आहे. दरम्यान, आता पाकिस्तानने अफगाणिस्तानला उघड धमकी दिली आहे. सोबतच पाकिस्तानने भारतावरही गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे आता जगभरात एकच खळबळ उडाली असून. भारत काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकी काय धमकी दिली?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे संरक्षणंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानसोबतच्या युद्धावर भाष्य केले आहे. त्यांनी अफगाणिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. सोबतच त्यांनी भारतावरही गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानविरोधात जेथे जेथे दहशवतादाची मुळं असतील तेथे आम्ही कारवाई करू. सोबतच दहशतवाद पोसणाऱ्यांना आता मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशाराच ख्वाजा आसिफ यांनी दिला. गेल्या अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानचे काही लोक पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहेत. या सर्व लोकांनी आता पाकिस्तान सोडून परत अफगाणिस्तानात परतायला हवे, असे मतही ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केले.

आता शांततेचे आवाहन

आमची जमीन ही 35 कोटी पाकिस्तानी नागरिकांची आहे. ही जमीन अफगाणी लोकांसाठी नाही, अशी कठोर भूमिकाही आसिफ यांनी घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नात अनेकांनी प्राणांचे बलिदान केले. मात्र काबुलकडून कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेली नाही. आता मात्र निषेधाची पत्रं आणि शांततेचे आव्हान केले जाणार नाही. आमच्याकडून कोणतेही प्रतिनिधीमंडळ काबूलला जाणार नाही, असे सांगत भविष्यात पाकिस्तान अफगाणिस्तानसंदर्भात कठोर भूमिका घेणार आहे, असे संकेत ख्वाजा आसिफ यांनी दिले.

भारतावर नेमके काय आरोप लावले?

ख्वाजा आसिफ यांनी भारतावरही काही आरोप केले आहेत. अफगाणिस्तान आता भारताची भाषा बोलू लागला आहे. अफगाणिस्तान भारताचा प्रतिनिधी बनला आहे. तहरिक ए तालिबा पाकिस्तान (टीटीपी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या तसेच भारातासोबत मिळून अफगाणिस्तान पाकिस्तानविरोधी कट रचत आहे. काबुलचे शासक भारतासोबत जाऊन बसले आहेत, असे मत ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, त्यांनी अफगाणिस्तान भारताच्या साथीने पाकिस्तानविरोधी कारवाया करत आहे, असा आरोपच आसिफ यांनी केला आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ