AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडून भारताला जिहादी धमकी

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच पंतप्रधान इमरान खान आणि पाकिस्तानी नागरिकांनीही भारताच्या या निर्णयावर टीका केली होती.

पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडून भारताला जिहादी धमकी
| Edited By: | Updated on: Aug 14, 2019 | 6:23 PM
Share

इस्लामाबाद (पाकिस्तान) : काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली. यानंतर पंतप्रधान इमरान खान आणि पाकिस्तानी नागरिकांनीही भारताच्या या निर्णयावर टीका केली होती. आता पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही भारातला जिहादी धमकी दिली आहे.

“युद्धा सारखी परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तान मागे हटणार नाही”, असं पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी म्हणाले.

आरिफ अल्वी यांनी पाकिस्तानी नागरिकांना सोशल मीडियावर काश्मीरमधील व्हिडीओ टाका, असं आव्हान केलं आहे. तसेच सोशल मीडियावर भारताविरुद्ध युद्ध करण्यासाठी भडकावले आहे. “आम्हाला युद्ध नको आहे. पण भारताने युद्ध केले तर त्यांच्याकडे जिहाद आणि लढण्याशिवाय काहीच राहिलेले नसेल”, असंही अल्वी म्हणाले.

“आज संपूर्ण जग बघत आहे पाकिस्तान काश्मिरी लोकांसोबत उभा आहे. त्यांची साथ देण्यासाठी आम्ही तयार आहे”, असं राष्ट्रपती अल्वी एका कार्यक्रमात म्हणाले. आज पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस होता.

दरम्यान, काश्मीरमधून 370 हटवून 9 दिवस झाले आहे. पाकिस्तानने या प्रकरणात अनेक देशांकडे मदत मागितली. पण प्रत्येक ठिकाणाहून निराशा हाती मिळाली. पाकिस्तान समजायला तयार नाही की काश्मीर प्रकरण हे भारतातील अतंर्गत प्रकरण आहे.

भारतात उद्या स्वातंत्र्य दिन आहे. पण पाकिस्तानकडून किंवा दहशतवाद्यांकडून धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...