AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचूप

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या नऊ तासांनंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली. ही घटना अत्यंत गंभीर असून हा चिंतेचा विषय असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली. मात्र, एरव्ही उठल्या-सुटल्या जगभरातील बहुतांश घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. ट्विटरवर नेहेमी प्रत्येक विषयावर आपलं मत मांडणाऱ्या […]

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचूप
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
Share

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या नऊ तासांनंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली. ही घटना अत्यंत गंभीर असून हा चिंतेचा विषय असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली. मात्र, एरव्ही उठल्या-सुटल्या जगभरातील बहुतांश घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ट्विटरवर नेहेमी प्रत्येक विषयावर आपलं मत मांडणाऱ्या इम्रान खान यांनी भारतीय जवानांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याबाबत मात्र एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या वर्षी पंतप्रधान झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वारंवार भारताला फुकटचे सल्ले देत असत, मात्र पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर इम्रान खान यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

पाकिस्तानकडून आलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, “जगातील कुठल्याही कोपऱ्यात झालेल्या हिंसंक कारवाईचा पाकिस्तानने निषेधच केला आहे. कुठलाही तपास न करता भारतीय मीडिया आणि सरकारने हल्ल्याचा संबंध सरळ पाकिस्तानशी जोडला, हा आरोप आम्ही नाकारतो.”

दुसरीकडे, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध होतो आहे. पाकिस्तानवरही टीका केली जात आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांचे समर्थन करणे थांबवावे. तसेच, त्यांच्या देशातून या कारवाया पार पाडणाऱ्या दहशतवाद्यांचा आता खात्मा करावा अशी मागणी जगभरातून होत आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ ​​वकासनं सुसाईड बॉमर बनून हा भ्याड हल्ला केला.

उरी हल्ल्यानंतर सर्वात मोठा हल्ला

उरीमध्ये (Uri Attack) सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. गुरुवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला केला. हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमधील अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचुप

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध

Pulwama Attack : पुलवामात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

पाकिस्तानविरोधात एकत्र या, भारताचं जगाला जाहीर आवाहन

Pulwama Attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांच्या नावाची यादी

पुलवामा हल्ला हा मुस्लीमविरोधी राजकारणाचा परिपाक : जितेंद्र आव्हाड

गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले

पुलवामा हल्ला : भारत पुन्हा एकदा घरात घुसून मारणार?

Pulwama attack : शहिदांचा आकडा 44 वर पोहोचला

आमच्या शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान मोदी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.