AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मीर प्रश्नी जे योग्य असेल ते मोदीच करतील : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वीपक्षीय मुद्दा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सांगितलं आणि पंतप्रधान मोदी हा प्रश्न सोडवतील याविषयी अपेक्षा व्यक्त केली.

काश्मीर प्रश्नी जे योग्य असेल ते मोदीच करतील : डोनाल्ड ट्रम्प
| Edited By: | Updated on: Aug 26, 2019 | 4:59 PM
Share

बैरट्स, फ्रान्स : जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढून राज्याचं पुनर्गठन केल्यापासून काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतोय. पण हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यासपीठावर फक्त स्पष्टच केलं नाही, तर जागतिक नेत्यांनी ते मान्यही केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वीपक्षीय मुद्दा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सांगितलं आणि पंतप्रधान मोदी हा प्रश्न सोडवतील याविषयी अपेक्षा व्यक्त केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती आणि पाकिस्तानलाही हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्यात रस आहे. पण भारताने पाकिस्तानचा आणखी एक प्रयत्न अयशस्वी केला. बैरट्समधील G-7 परिषदेत पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात द्वीपक्षीय बैठक झाली. बैठकीनंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर माहिती दिली.

यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “गेल्या रात्री पंतप्रधान मोदी यांच्याशी सकारात्मक बैठक झाली, ज्यात काश्मीरविषयी देखील चर्चा केली. हा प्रश्न नियंत्रणात असल्याची पंतप्रधान मोदी यांना खात्री आहे. त्यांची पाकिस्तानशीही चर्चा झाली आहे आणि मला खात्री आहे की जे चांगलं आहे ते मोदी करतील.”

या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनीही पुन्हा एकदा भारताची भूमिका स्पष्ट केली. भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्र 1947 च्या पूर्वी एकत्रच होते. दोन्ही राष्ट्रांमधील प्रश्नासाठी आम्ही तिसऱ्या देशाला कष्ट देणार नाही. आम्ही चर्चेतून प्रश्न सोडवू, असं मोदींनी सांगितलं.

इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना आपण स्वतः फोन करुन शुभेच्छा दिल्याची आठवणही मोदींनी करुन दिली. भारत आणि पाकिस्तान दारिद्र्याविरोधात लढण्यासाठी एकत्र येऊ शकतात आणि लोकांचं कल्याणही करु शकतात, असं मोदी म्हणाले.

संबंधित ब्लॉग आणि बातम्या वाचा :

ब्लॉग : माझं घे, माझं घे म्हणून दुकान मांडणे ‘यालाच’ म्हणतात!

ब्लॉग : ‘दिव्याखाली अंधार’ असताना अमेरिकेचं भारताकडे बोट

यावर्षी भारतालाही निमंत्रण दिलेली G-7 परिषद काय आहे?

मोदी-मोदीच्या घोषणा, पॅरिसमध्ये UNESCO चं मुख्यालय दणाणलं

तिसऱ्या देशाची लुडबूड नको, काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ

पाकिस्तान भारताविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार

इम्रान खान यांनी मदतीसाठी फोन केला, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘तुमचं तुम्ही पाहून घ्या’

UNSC : सय्यद अकबरुद्दीन पाक पत्रकाराच्या जवळ गेले, शिमला करार सांगितला

चीन विसरला – ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंकते’

UNSC बैठकीत चीनला पाकिस्तानचा पुळका, रशिया भारतासाठी मैदानात

UNSC ची 48 वर्षांनी काश्मीर प्रश्नावर बैठक, ‘या’ कारणामुळे भारत निश्चिंत

भारत बालाकोटपेक्षा मोठ्या कारवाईच्या तयारीत, इम्रान खानला भीती

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.