भारताच्या मदतीला धावला रशिया, थेट अत्यंत मोठा प्रस्ताव, 3600 हून अधिक..
भारत आणि रशिया यांच्यातील संबंध कायमच चांगले राहिले आहेत. भारत आणि रशियाने दोन्ही देशांनी एकमेकांना खंबीरपणे साथ दिली. त्यामध्येच आता नवा प्रस्ताव भारताला रशियाने दिलाय. हा प्रस्ताव भारताकरिता अत्यंत फायदेशीर ठरेल.

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध कायमच चांगली राहिली आहेत. दोन्ही देशांनी संकटात एकमेकांची साथ कोणताही विचार न करता दिली. विशेष म्हणजे हे संबंध काही आताचे चार दिवसांचे नाही तर अनेक वर्षांची आहेत. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर भारताच्या मदतीला रशिया आला. भारताकरिता आपली बाजारपेठ खुली केली. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर 200 टक्के टॅरिफ लावला. भारत आणि रशियात अनेक मोठे संरक्षण करार झालीत. रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दाैऱ्यावर आले, त्यावेळी ते आपल्यासोबत तब्बल 8 मंत्र्यांनाही घेऊन आले, त्यावेळी त्यांनी काही करार भारतासोबत केले. जग फक्त भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री बघतच राहिले. यादरम्यानच रशियाने आता भारताला अत्यंत मोठा प्रस्ताव दिला. रशियाच्या या प्रस्तावाने भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे.
रशियाचा भारताला अत्यंत मोठा प्रस्ताव
रशियाच्या अग्रगण्य डिझायनरने भारताच्या 3600 हून अधिक रणगाड्यांना अत्याधुनिक अपग्रेड देण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशियाचे अग्रगण्य रणगाडा डिझायनर भारताच्या रणगाडा ताफ्याला आणखी शक्तिशाली बनवण्यासाठी मदत करण्यास तयार आहेत. भारतीय लष्करात सध्या 3600 हून अधिक रणगाडे हे रशियन बनावटीची आहेत.
पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावला रशिया
या रणगाड्यांचे उत्पादन भारतात अनेक दशकांपासून परवान्याअंतर्गत केले जाते. स्पुतनिक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, उरल डिझाइन ब्युरो ऑफ ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंगचे महासंचालक आणि मुख्य डिझाइनर आंद्रेई तेर्लिकोव्ह यांनी रणगाड्यांच्या आधुनिकीकरणाविषयी सहकार्याविषयी महत्वाची माहिती दिली. हा भारताकरिता अत्यंत मोठा प्रस्ताव असल्याचे बोलले जात आहे.
जगाच्या नाकावर टिच्चून भारत आणि रशिया पुन्हा एकदा एकत्र
ऑपरेशन सिंदूरमध्ये रशियाने भारताला दिलेल्या शस्त्रांनी धमाल दाखवली. हवेतच पाकिस्तानचे बॉम्ब फुटत होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. पाकिस्तानात घुसून दहशवाद्यांचे अड्डे भारताने उद्धवस्थ केली, तरीही पाकिस्तान काहीच करू शकला नाही. त्यामध्येच भारत आणि रशियात विविध संरक्षण करार होताना दिसत आहेत.
