AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan:…तर कलकत्यावर थेट हल्ला!पाकचा संरक्षण मंत्री बरळला, युद्धाला तोंड फुटणार?

India-Pakistan Operation Sindoor: पाकिस्तानची शेपूट वाकडीच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दहशतवाद्यांचा स्वर्ग असणार्‍या पाकड्यांना युद्धाचे स्वप्न पडू लागले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये सपाटून मार खाल्यानंतरही पाकड्यांची युद्धाची खुमखुमी कमी झालेली नाही. आता त्यांनी कोलकत्यावर थेट हल्ल्याची धमकी दिली आहे.

Pakistan:...तर कलकत्यावर थेट हल्ला!पाकचा संरक्षण मंत्री बरळला, युद्धाला तोंड फुटणार?
ख्वाजा आसिफ, भारत-पाकिस्तान युद्धImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 05, 2026 | 8:44 AM
Share

Khawaja Asif Threaten to Attacked on Kolkata: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना युद्धज्वराने पछाडले आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान्यांनी त्यांच्या नाकात दम आणलेला आहे. तर यापूर्वी ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचे मोठे नुकसान झाले आहे. तर पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. आता आसिफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. जर भविष्यात दोन्ही देशात संघर्ष उद्भवला. तर पाकिस्तान मुंबई, दिल्लीच नाही तर कोलकत्यावरही हल्ला करेल अशी बडबड त्यांनी केली. ख्वाजांचे वक्तव्य दोन्ही देशातील तणाव वाढवणारं मानलं जात आहे. त्याला आता भारताकडून काय उत्तर मिळतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑपरेशन सिंदूरचा वर्मी घाव विसरला पाक

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे. त्यांनी भारताविरोधातील संभावित तणावाविषयी बोलताना व्यर्थ बडबड केली. भविष्यात भारतासोबत संघर्ष पेटला तर पाकिस्तान आता सीमावर्ती भागावर अथवा मुंबई, दिल्लीपर्यंत मर्यादित राहणार नाही. कोलकत्ता शहरावर सुद्धा थेट हल्ला करणार असल्याची धमकी त्यांनी दिली. शनिवारी, 4 एप्रिल रोजी सियालकोटमध्ये माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी भारताने आता कोणतेही साहस करू नये, नाहीतर त्यांचे पूर्वेतील सर्वात मोठे शहर कोलकत्तावर आम्ही थेट हल्ला करू अशी पोकळ धमकी त्यांनी दिली. ख्वाजा आसिफ यांना ऑपरेशन सिंदूरचा विसर पडल्याचे आता म्हटले जात आहे.

पाकला बदनाम करण्याचा भारताचा डाव

ख्वाजा आसिफ म्हणाले की भारत हा फॉल्स फ्लॅग ऑपरेशनची तयारी करत आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचा भारताचा डाव आहे. पण भारत कशा प्रकारे पाकिस्तानला बदनाम करतोय, त्याचे पुरावे विचारले असता ख्वाजा आसिफ त्यावर बोलले नाहिी. पण भारत पाकिस्तानी नागरिकांना आणि त्यांच्या नागरिकांच्या माध्यमातून पाकला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ख्वाजा यांनी केला.

यापूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जर पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी कारवाया केल्या तर यावेळी पाकिस्तानने स्वप्नात विचार केला नाही असा धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. यावेळी निर्णायक कारवाई करण्यात येईल असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला होता.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?