AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला माहित आहे? पूर्वी पृथ्वीवर फक्त 5 तासांचा एक दिवस असायचा ! वाचा सविस्तर

कधी विचार केलात का, दिवस 24 तासांचाच का असतो? खरं तर, पूर्वी तो फक्त 5 तासांचा होता! चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी दूर जातो आहे आणि त्यामुळे दिवस हळूहळू लांबत चाललेत. पण हा बदल किती मोठा आहे? आणि याचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो? चला, जाणून घेऊ!

तुम्हाला माहित आहे? पूर्वी पृथ्वीवर फक्त 5 तासांचा एक दिवस असायचा ! वाचा सविस्तर
पृथ्वी
| Edited By: | Updated on: Apr 10, 2025 | 3:53 PM
Share

काही वेळा आपण इतके कामात असतो की आज आपल्याला 24 तासही कमी पडतात. पण कल्पना करा – जर दिवसच फक्त 5 तासांचा असता, तर? कामं संपायच्या आधीच रात्र झाली असती! ही काही काल्पनिक कथा नाही तर हे खरं वास्तव आहे.

करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीवर दिवस फक्त काही तासांचा असायचा. कारण त्यावेळी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी खूप वेगाने फिरायची आणि त्यामुळे दिवस लवकर संपायचा.

पृथ्वीच्या फिरण्याचा चंद्राशी संबंध काय ?

पृथ्वी आणि चंद्र यांच्यात एक “गुरुत्वाकर्षण खेच” चालू असते, ज्याला टाइडल फोर्सेस म्हणतात. चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर परिणाम करतं, विशेषतः समुद्रांवर – त्यामुळे लाटा तयार होतात. पण या प्रक्रियेमुळे पृथ्वीला एक प्रकारे ब्रेकही लागतो.

हळूहळू पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होतो आणि त्यामुळे दिवस लांब होत जातो.

चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून दूर जात चालला आहे

आज चंद्र दरवर्षी 3.82 सेंटीमीटरने पृथ्वीपासून दूर जातो आहे. या छोट्याशा हालचालीमुळे दर 100 वर्षांत पृथ्वीचा दिवस सुमारे 1.7 मिलीसेकंदांनी लांबतो. डॉ. मॅगी एडरिन-पोकॉक यांच्या मते, “हा बदल छोटा वाटतो, पण दीर्घकाळात त्याचा पृथ्वीच्या गतीवर आणि हवामानावरही परिणाम होऊ शकतो.”

भूतकाळापासून ते वर्तमानापर्यंत पृथ्वीच्या फिरण्याचा बदल कसा झाला

जेव्हा चंद्र नव्याने तयार झाला होता, तेव्हा पृथ्वीचे दिवस फक्त 5 तासांचे होते. पण गेल्या कोट्यवधी वर्षांत चंद्राच्या “ब्रेकिंग इफेक्ट” मुळे दिवस 24 तासांपर्यंत लांबले आहेत.

आता प्रश्न असा येतो पुढे पृथ्वीचे काय होणार ?

उत्तर असं आहे की, दिवस अजूनही लांबतच जाणार आहेत. चंद्र जसाजसा दूर जाईल, तसा पृथ्वीचा गतीवेग कमी होईल. अर्थात, हे इतकं हळूहळू घडतंय की आपल्या आयुष्यात फारसा फरक जाणवणार नाही.

थोडक्यात सांगायचं तर…

पृथ्वीवरील दिवस म्हणजे केवळ घड्याळात मोजलेली वेळ नाही, तर तो चंद्राशी असलेल्या नात्याचं एक सुंदर उदाहरण आहे. हे नातं अजूनही बदलत आहे – हळूहळू, पण नक्कीच!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.