AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावाचं पाणीच न्यारं… ना बायका म्हाताऱ्या होत, ना आजारी पडत; हे गाव माहीत आहे काय?

हुन्जा घाटीतील आदिवासी समाजाचे लोक असाधारण दीर्घायुषी आणि तरुण दिसतात. महिला 65-70 वर्षांच्या वयातही तरुण दिसतात आणि मुलांना जन्म देतात, तर पुरुष 90 वर्षांच्या वयातही बाप होतात. त्यांची निरोगी जीवनशैली, पर्वतीय जीवन आणि विशेष आहार यांचा या दीर्घायुष्यात मोठा वाटा आहे. ते स्वतः उगवलेले पौष्टिक पदार्थ खातात आणि क्वचितच आजारी पडतात.

या गावाचं पाणीच न्यारं... ना बायका म्हाताऱ्या होत, ना आजारी पडत; हे गाव माहीत आहे काय?
| Edited By: | Updated on: Dec 18, 2024 | 3:59 PM
Share

प्रत्येक भागाची एक वेगळी गंमत असते. त्याचं वेगळंपण असतं. पण भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असंही एक गाव आहे, ज्या ठिकाणचं वेगळेपण काही औरच आहे. या ठिकाणच्या बायका म्हाताऱ्याच होत नाही. त्या म्हातारपणातही अत्यंत सुंदर दिसतात. त्यांचं वय असतं 80 वगैरे वगैरे… पण त्यांना पाहिल्यावर त्या पंचवीशी आणि तिशीतील असतात. बरं हे तर काहीच नाही, या बायका कधीकधी आजारीही पडत नाही. आता बोला. या गावाचं पाणीचं न्यारं म्हणायचं की वारं न्यारं म्हणयाचं? कुठे आहे हे गाव? काय खातात? कसे राहतात या गावची लोकं? आम्ही तुम्हाला तीच गंमत सांगणार आहोत.

काश्मीर खोऱ्यातील गाव

पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या डोंगराळ भागात हुन्जा खोरे आहे. या ठिकाणी हा आदिवासी समाज आहे. हुन्जा घाटी ही भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर आहे. या आदिवासी जमातीचं वैशिष्ट्ये म्हणजे या जातीतील लोक अत्यंत सुंदर आणि तरुण दिसतात. या समुदायातील महिला 65 आणि 70 व्या वर्षीही तरुण दिसतात. विशेष म्हणजे या वयातही या महिला मुलांना जन्म देतात.

हुन्जा गाव हिमालयातील पर्वत रांगेत आहेत. या गावाला जग छत नावानेही ओळखते. भारताच्या उत्तरेकडे हे गाव आहे. या ठिकाणी भारत, पाकिस्तान, चीन आणि आफगाणिस्तानच्या सीमाही लागतात. या आदिवासी समुदायाची संख्या 87000 आहे. या आदिवासी समुदायाची जीवनशैली अत्यंत जुनी आहे.

90 व्या वर्षी बाप बनतात

गिलगित-बाल्टिस्तानच्या डोंगरात हे गाव आहे. या ठिकाणी हुन्जा आदिवासी समुदायाचे लोक राहतात. या गावातील महिलांचं आयुर्मान सरासरी 110 ते 130 एवढं असतं. काही लोक तर 150 वर्षही जगतात. या ठिकाणी राहणारे लोक वयाच्या 70व्या वर्षीही 20 वर्षाचे दिसतात. तर पुरुष 90व्या वर्षीही बाप बनतात. या लोकांचं खास वैशिष्ट्ये म्हणजे हे लोक क्वचितच आजारी पडतात. या ठिकाणचे लोक गोरेपान, हसतमुख आणि तरूण असतात. हे लोक रोज 15 ते 20 किलोमीटर पायी चालतात. तसेच हे लोक आपल्याच समुदायात लग्न करतात.

निरोगी जीवनशैली

या गावातील लोक स्वत: उगवलेल्या भाज्या खातात. हे लोक खुबानी आणि उन्हात सुकवलेले अक्रोड खूप खातात. ज्वारी, बाजरी आणि कुट्टु मोठ्या प्रमाणावर खातात. दिवसातून फक्त दोन वेळा ते जेवण करतात. हे लोक अलेक्झांडर सिकंदरच्या काळातील आहे. जेव्हा सिकंदर जग जिंकायला निघाला होता, तेव्हा हे लोक त्यांच्यासोबत आले होते. त्यानंतर हे लोक काश्मीर खोऱ्यात थांबले. त्यामुळे त्यांच्या आदिवासी समूहाच्या नावावरूनच ते राहत असलेल्या ठिकाणाला हुन्जा घाटी हे नाव पडलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.