AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement Rights Day | चला, जाणून घेऊयात, निवृत्ती वेतनधारकांचे हक्क आणि अधिकार…!

आपली नोकरी संपली की अनेकांना आपले हक्क आणि अधिकार माहित नसतात. आपण जाणून घेऊयात असेच काही सरकारी निवृत्ती वेतनधारकांचे हक्क आणि अधिकार...

Retirement Rights Day | चला, जाणून घेऊयात, निवृत्ती वेतनधारकांचे हक्क आणि अधिकार...!
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 7:05 AM
Share

नाशिकः आज निवृत्ती हक्क दिवस आहे. नोकरी करणारी व्यक्ती कधी ना कधी तरी निवृत्त होणारी असते. अनेक जण वेगळ्या वाटा धुंडाण्यासाठी मधेच नोकरी सोडतात. मात्र, काही जणांना आयुष्याच्या संध्याकाळपर्यंतही नोकरी हवीहवीशी वाटू शकते. मात्र, आपली नोकरी संपली की अनेकांना आपले हक्क आणि अधिकार माहित नसतात. आपण जाणून घेऊयात असेच काही सरकारी निवृत्ती वेतनधारकांचे हक्क आणि अधिकार…

सेवानिवृत्ती लाभांचे भाग

खरे तर निवृत्ती वेतन लाभ हे निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला सतत उत्पन्न आणि सुरक्षित जीवनाची खात्री देतात. त्यामुळे निवृत्त सरकारी अधिकारी सुस्थितीत आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जगू शकतात. त्यासाठीच पेन्शनच्या तरतुदी आहेत. सेवानिवृत्तीच्या फायद्यांमध्ये मुख्यत्वे कर्मचार्‍यांच्या रजेचे रोखीकरण, सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि त्यांच्या सेवाकाळात त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात योगदान देत असलेल्या रकमेचा समावेश होतो. ही सर्व रक्कम एकत्र केल्यावर त्यांना चांगलाच लाभ मिळतो. ही रक्कम कर्मचार्‍यांच्या निवृत्त जीवनाचा आर्थिक आधार असते. त्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही.

इतर फायदे

सेवानिवृत्ती लाभांव्यतिरिक्त सेवानिवृत्त सरकारी अधिकारी देखील निवृत्तीवेतन लाभांसाठी पात्र आहेत. हे फायदे त्यांना आर्थिक बाबतीत कोणत्याही अडचणींशिवाय शांततापूर्ण सेवानिवृत्त जीवन जगू देतात. सेवानिवृत्त सरकारी अधिकार्‍यांसाठी त्यांच्या नोकरीच्या शेवटी उपलब्ध असलेले विविध प्रकारचे निवृत्तीवेतन म्हणजे सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती निवृत्तीवेतन, अनुकंपा भत्ते, कौटुंबिक निवृत्तीवेतन, नुकसान भरपाई पेन्शन आणि असाधारण निवृत्तीवेतनाचा समावेश होतो.

निवृत्ती वेतन योजना

जे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी 60 वर्षांचे होईपर्यंत सेवा करतात त्यांच्यासाठी निवृत्ती वेतन योजना लागू आहे. 20 वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर केवळ तीन महिन्यांनी सेवानिवृत्त होऊ इच्छिणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना ऐच्छिक निवृत्ती वेतन दिले जाते. असाधारण निवृत्तीवेतन योजना ही आहे. यात निवृत्त सरकारी कर्मचार्‍यांना जे भिन्न-अपंग किंवा शारीरिकदृष्ट्या विकलांग आहेत किंवा ज्या सरकारी कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या नोकरीच्या सेवेत आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यांच्या कुटुंबांना मदत दिली जाते. कुठलाही शासकीय कर्मचारी निवृत्त होतो, तेव्हा त्याला निवृत्तीवेतन दिले जाते. ते त्याच्या मृत्यूपर्यंत सुरू राहते. मृत्यूपश्चात या निवृत्तीवेतनाचा काही हिस्सा त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीलाही मिळतो. काही प्रसंगात, या कर्मचाऱ्याच्या अपत्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचीही तरतूद शासनात आहे. पण या निवृत्ती वेतनाचेही अनेक प्रकार असतात.

निवृत्ती वेतनाचे प्रकार

निवृत्तीवेतनाचे 8 प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, पूर्णसेवा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, भरपाई निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतन, असाधारण कुटूंब निवृत्तीवेतन. नियत वयोमानानुसार म्हणजे वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यावर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. स्वेच्छा निवृत्ती, रूग्णता आणि भरपाई हेही निवृत्तीचे प्रकार आहेत. अकार्यक्षमतेमुळे देण्यात येणारी निवृत्ती म्हणजे अनुकंपा निवृत्ती. निवृत्ती वेतन घेणारा जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या कुटुंबाला मिळते ते कुटूंब निवृत्ती वेतन. एखादा सरकारी कर्मचारी हरवल्यास त्याच्या कुटुंबाला त्रास होवू नये म्हणून असाधारण कुटूंब निवृत्ती देतात.

निवृत्ती वेतन कोणाला मिळते?

सेवानिवृत्ती वेतनासाठी कमीत कमी 10 वर्ष कालावधी हिशेबात घेतला जातो. आता 10 वर्ष सेवा झाल्यानंतर शेवटच्या वेतनावर पूर्ण निवृत्ती वेतन दिले जाते. ज्या कर्मचाऱ्यांची अर्हताकारी सेवा 10 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना निवृत्तीवेतनाऐवजी सेवा उपदान दिले जाते. निवृत्ती वेतनाची मोजणी ही निवृत्तीपूर्वी शेवटच्या 10 महिन्यांत घेतलेल्या वेतनाच्या सरासरीवर किंवा कर्मचारी ज्या पदावरून सेवानिवृत्त झाला आहे, त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेल्या मूळ वेतनाच्या 50% दराने यापैकी जे फायदेशीर असेल ते निवृत्ती वेतन देय असते.

कुटूंब निवृत्तीवेतन म्हणजे काय?

कुटूंब निवृत्तीवेतनाचेही दोन प्रकार आहेत. त्यात कर्मचाऱ्याचा सेवेत मृत्यू झाल्यास आणि निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यानंतर. कुटूंब निवृत्तीवेतन हे कर्मचाऱ्याच्या पत्नी किंवा पतीस मिळते. एक वर्ष सेवा झाल्यानंतर सेवेत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटूंब निवृत्ती वेतन देय होते. एक वर्ष सलग सेवा होण्यापुर्वी मृत्यू झाला असेल व अशा कर्मचाऱ्याची सेवेत नेमणूक होण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी झाली असेल, तर त्यांच्या कुटूंबीयांना कुटूंब निवृत्ती वेतन मिळते.

खासगी आस्थापनांचे नियम वेगळे

आपण निवृत्ती वेतनधारकांचे हक्क आणि अधिकार पाहिले. मात्र, खासगी आस्थापनांमध्ये नियम वेगळे आहेत. तिथे बहुतांश जणांना निवृत्ती वेतन मिळत नाही. खासगी ठिकाणी आपले नियमित वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युईटीच्या नियमात सदर कर्मचारी बसत असेल, तर ती नियानुसार मिळते. अनेक ठिकाणी शिल्लक सुट्ट्यांचे पैसे किती मिळणार याचेही वेगवेगळे नियम आहेत. कंपनीनुसार या नियमात बदल होतो. सध्या बहुतांश ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर भरती असते. त्यामुळे या वर्गाला म्हणावा तितका लाभ निवृत्तीनंतर मिळताना दिसत नाही.

इतर बातम्याः

Ajit Pawar | हा अधिकार त्यांचाच आहे म्हणत अजित पवारांनी राज्यपालांना लोकशाहीचा धडा सांगितला, नेमकं काय म्हणाले?

Mumbai : मुंबई विद्यापीठाच्या जागेवरील एसआरए प्रकल्प बंद पाडला, भूखंड ताब्यात घेतल्यास राजीनामा देईन-सामंत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.