AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनापाठोपाठ ‘नोरो व्हायरस’ने भरवली धडकी; ‘या’ देशाला आणले जेरीस

इंग्लंडमध्ये आतापर्यंत या विषाणूचे 154 रुग्ण आढळले आहेत. तेथील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला प्रचंड सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

कोरोनापाठोपाठ 'नोरो व्हायरस'ने भरवली धडकी; 'या' देशाला आणले जेरीस
कोरोनापाठोपाठ 'नोरो व्हायरस'ने भरवली धडकी
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 6:58 AM
Share

नवी दिल्ली : कोरोनापाठोपाठ आता ‘नोरो व्हायरस’ या नव्या विषाणूने संपूर्ण जगाची धास्ती वाढवली आहे. हा विषाणू कोरोनासारखाच पसरत चालला आहे. पोटदुखी, उलट्या, जुलाब यांसारखी या रोगाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. सध्या हा विषाणू इंग्लंडमध्ये थैमान घालत आहे. मात्र, चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूप्रमाणे ‘नोरो व्हायरस’ने हातपाय पसरले तर… याची चिंता अनेक देशांना सतावत आहे. विविध देशांनी याबाबत आपल्या नागरिकांना सावध केले आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत या विषाणूचे 154 रुग्ण आढळले आहेत. तेथील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला प्रचंड सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. देशात कोरोनाच्या नियमावलीतील निर्बंध अलीकडेच कमी करण्यात आले होते. पण आता ‘नॉरोव्हायरस’च्या उद्रेकानंतर पुन्हा निर्बंध कडक करण्याची वेळ इंग्लंडवर आली आहे.

रुग्णसंख्या सतत वाढत आहेत

पब्लिक हेल्थ इंग्लंड सातत्याने रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. या आरोग्य आपत्कालीन परिस्थितीनुसार गेल्या काही दिवसांत या विषाणूची रुग्णसंख्या तीन वेळा वाढली आहेत. सर्वात भयानक बाब म्हणजे नर्सरी आणि बाल देखभाल केंद्रे यासारख्या मुले अधिक असलेल्या ठिकाणी या विषाणूच्या रुग्णसंख्या अधिक आढळली आहेत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) म्हटले आहे की, कोरोना विषाणूपेक्षा नॉरोव्हायरस जास्त धोकादायक आहे आणि यामुळे संसर्ग वेगाने पसरतो. या विषाणूचा संसर्ग झालेल्या कोणालाही उलट्या आणि अतिसार सारखी लक्षणे आहेत.

संसर्ग कसा होतो?

पीएचईने त्याचे नाव ‘विंटर वॉमिटिंग बग’ ठेवले आहे. सीडीसीने म्हटले आहे की, नॉरोव्हायरसमध्ये कित्येक अब्ज व्हायरस आहेत आणि त्यापैकी काही विषाणूच लोकांना आजारी पाडू शकतात. कोविड -19 चा ज्या देशांमध्ये पुन्हा प्रसार होत आहे त्या देशांव्यतिरिक्त इंग्लंडमध्येही नॉरोव्हायरस ही चिंताजनक बाब बनली आहे. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, जर एखादी व्यक्ती या विषाणूचा संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्क आली, संक्रमित पदार्थ खाल्ले, विषाणूमुळे प्रभावित एखाद्या पृष्ठभागाला स्पर्श केला किंवा हात न धुता तोंडात घातला तर या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त आहे. हा विषाणू इतर विषाणूप्रमाणेच हा शरीरात प्रवेश करते आणि त्यास संक्रमित करते.

सीडीसीच्या मते, काहीही स्पर्श केल्यावर, डायपर बदलल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर आणि काहीही खाण्यापूर्वी आपले हात नेहमीच धुणे महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त कोविड -19 पासून बचाव करण्यासाठी लोक ज्या प्रकारे सेनिटायझर्स वापरत आहेत, त्याच प्रकारे त्यासाठी अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरणे चांगले.

2 ते 3 आठवड्यांपर्यंत उलट्या होणे

या विषाणूच्या लक्षणांमध्ये अतिसार, उलट्या होणे, चक्कर येणे आणि ओटीपोटात तीव्र वेदना होणे ही सामान्य लक्षणे आहेत. विषाणूमुळे पोटात तीव्र जळजळही होऊ शकते. याशिवाय बर्‍याच रुग्णांमध्ये ताप, डोकेदुखी आणि शरीरावर वेदना देखील दिसून आले आहे. विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर 12 ते 48 तासांच्या आत हा संसर्ग पसरतो. सीडीसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित झाल्यास एखाद्या संक्रमित व्यक्तीस किती काळ संरक्षण मिळू शकते याबद्दल अद्याप पुष्टीकरण झाले नाही. आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे की हा विषाणू टाळण्यासाठी कोरोनाशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीस 2 ते 3 आठवड्यांपर्यंत उलट्या होतात. त्यानंतर त्याला थोडे बरे वाटते.

इतर बातम्या

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा इस्कॉनसोबत करार, शेतकऱ्यांचा विकास तसेच संशोधनावर केले जाणार काम

दीपक चाहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.