AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी होत असलेले प्राणी माहित आहेतच, पण झपाट्याने वाढत असलेल्या ‘या’ जीवांची नावं ऐकून थक्क व्हाल!

एकीकडे अनेक प्राणी कमी होत असताना, जगात काही जीवांची संख्या मात्र आश्चर्यकारकपणे वाढत आहे. या अनपेक्षित वाढीमागे आहे निसर्गाचा अजब खेळ आणि मानवी बदलांचा परिणाम! चला, जाणून घेऊया त्या जीवांबद्दल ज्यांची लोकसंख्या वाढतेय आणि त्यामागचं आश्चर्यकारक वास्तव!

कमी होत असलेले प्राणी माहित आहेतच, पण झपाट्याने वाढत असलेल्या 'या' जीवांची नावं ऐकून थक्क व्हाल!
| Edited By: | Updated on: Apr 28, 2025 | 3:00 PM
Share

सध्या जगभर हवामान बदल, प्रदूषण आणि जंगलतोड यामुळे अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती कमी होत चालल्या आहेत. ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. दिवसेंदिवस बिबटे, गवे, पक्ष्यांचे विविध प्रकार आणि इतर अनेक प्राणी आपल्या डोळ्यांसमोर नाहीसे होत आहेत. यावर पर्यावरण तज्ज्ञही वारंवार चिंता व्यक्त करत असतात.

पण याच निसर्गात एक वेगळीच गंमत सुरू आहे. ज्या काळात काही प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्याच वेळी काही जीव मात्र धडधडीत वेगाने वाढत आहेत. ही वाढ काही ठिकाणी पर्यावरणासाठी अडचणीचं कारण बनली आहे, तर काही ठिकाणी आनंदाची बातमी घेऊन आली आहे.

कोणते आहेत हे प्राणी ?

उंदीर : उंदीर हा जगात कुठेही सहज आढळणारा प्राणी! पण अलीकडच्या काळात शहरांमध्ये उंदरांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. वाढतं तापमान, अन्न सुलभतेने उपलब्ध होणं आणि माणसांनी निर्माण केलेली जागा यामुळे उंदीर मोकाट वाढत आहेत. एका अभ्यासानुसार, अनेक शहरांमध्ये उंदरांची संख्या तब्बल ४० टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ केवळ अन्नाचा हक्क चोरण्यातच नाही, तर रोगराई पसरवण्यातही मोठा वाटा उचलते.

कबुतर : पूर्वी कबुतर पाहायला छान वाटायचं, पण आता कबुतरांची संख्या एवढ्या वेगाने वाढतेय की काही ठिकाणी ही समस्या बनली आहे. भारतात गेल्या काही वर्षांत कबुतरांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. इमारतींच्या खिडक्या, गॅलऱ्या आणि ओटे हे कबुतरांसाठी घरं झाली आहेत आणि त्यांचा मोठा समूह पाहायला मिळतो.

साप आणि अजगर : ग्रामीण भागात साप आणि अजगरांची संख्या देखील काही भागांत वाढल्याचं निरीक्षण आहे. विशेषतः पिकांच्या जागा, शेतात आणि गावांच्या कडेला हे जीव अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. यामागे हवामान बदल, पाणी आणि खाद्यसाखळीतील बदल कारणीभूत असू शकतात.

वाघ : सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे वाघांच्या संख्येत झालेली वाढ! भारतात वाघ वाचवण्यासाठी राबवलेल्या प्रकल्पांनी चांगलं काम केलं आहे. एकेकाळी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले वाघ आज देशभरात पुन्हा दिसू लागले आहेत. मागच्या दशकात वाघांची संख्या जवळपास दुप्पट झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.