AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला ट्रेनमधून तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात का, काय सांगतो कायदा? जाणून घ्या तुमचे हक्क

ट्रेनमधून रोज असंख्य महिला प्रवास करतात. पण त्याआधी तिकिट फार महत्त्वाचं असतं. पण महिला तिकिटाशिवाय देखील प्रवास करु शकतात. पण त्यांना काही नियम माहिती असायला हवेत... तर कायदा काय सांगतो जाणून घ्या.

महिला ट्रेनमधून तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात का, काय सांगतो कायदा? जाणून घ्या तुमचे हक्क
महिलांचे हक्क
| Updated on: Nov 18, 2025 | 3:03 PM
Share

आजच्या काळात असंख्य महिला ट्रेनने प्रवास करतात. मुंबईतील महिलांसाठी तर, लोकल लाईफ लाईन आहे. ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी तिकिट काढणं गरजेचं आहे. पण महिला तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात… पण त्यासाठी तुम्हाला काही अधिकार माहिती असायला हवेत. तुम्हाला तुमचे अधिकार माहिती असतील तर, तुम्हाला कोणीत ट्रेनमधून उतरवू शकणार नाही. तर ते अधिकार कोणते आहेत त्याबद्दल जाणून घ्या. जर तुमच्याकडे ट्रेनमध्ये प्रवास करताना तिकीट नसेल, तर टीटीई महिलेला खाली उतरवतो, पण रेल्वेच्या नियमानुसार, टीटीई महिलेला ट्रेनमधून खाली उतरवू शकत नाही.

महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी, रेल्वेने 1989 मध्ये एक कायदा मंजूर केला होता, त्यानुसार कोणत्याही महिलेला ट्रेनमधून उतरण्या आधई टीटीईला काही नियम आणि शर्ती लक्षात ठेवाव्या लागतात. तिकिट नसल्यास महिला ट्रेनमधून उतरण्याऐवजी टीटीईकडून संरक्षण मागू शकतात.

भारतीय रेल्वे कायदा 1989 काय म्हणतो? हा कायदा ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना अधिकार देतो. तुमच्या माहितीसाठी, भारतीय रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 139 मध्ये महिलांच्या हक्कांबद्दल सांगितलं आहे. भारतीय रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 139 नुसार, जर एखादी महिला किंवा मूल रात्रीच्या वेळी तिकिटाशिवाय ट्रेनमध्ये एकटे प्रवास करत असेल, तर या कायद्यांतर्गत टीटीई त्यांना काढून टाकू शकत नाही.

जर एखाद्या टीटीईने मध्यरात्री एखाद्या महिलेला ट्रेनमधून खाली उतरवलं तर ती महिला संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडे टीटीईविरुद्ध तक्रार दाखल करू शकते. जर एखादी महिला तिकिटाशिवाय प्रवास करत असेल तर टीटीई तिला कोणत्याही स्टेशनवर उतरवू शकत नाही. तिला फक्त जिल्हा मुख्यालयाच्या स्टेशनवर सोडता येतं.

घाई किंवा इतर कारणांमुळे महिला तिकिटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करतात हे अनेकदा दिसून येतं. हे चुकीचे असं तरी, टीटीई महिला किंवा मुलांना त्रास देऊ शकत नाहीत. जर एखादी महिला किंवा मूल तिकिटाशिवाय प्रवास करत असेल, तर टीटीई दंडासह रेल्वे तिकीट देऊ शकतो, परंतु मध्यरात्री त्यांना उतरवू शकत नाही.

पण, टीटीई त्यांना उतरवण्याचा आग्रह धरू शकतो. कन्फर्म तिकिटशिवाय प्रवास करणाऱ्या महिला देखील प्रवास करताना दिसतात. जर एखाद्या महिलेचं तिकीट प्रलंबित असेल आणि ती ट्रेनमध्ये चढली तर टीटीई तिला उतरवू शकत नाही.

(टीप: जर तुमच्याकडे विशिष्ट केस असेल तर कायदेशीर वकिलांचा सल्ला घेणं उचित आहे. येथे दिलेली माहिती केवळ न्यायालयाच्या निर्णयांवर आणि लेखांवर आधारित आहे.)

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच