सायकलवरुन पंढरपूरवारी, 24 जणांचं गावात जंगी स्वागत, तब्बल 180 जणांना कोरोना

सायकलवरुन पंढरपूरला दर्शनासाठी जाऊन आलेल्या नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावातील 24 जणांना कोरोनाची लागण झाली होती.

सायकलवरुन पंढरपूरवारी, 24 जणांचं गावात जंगी स्वागत, तब्बल 180 जणांना कोरोना
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 5:24 PM

नाशिक : सायकलवरुन पंढरपूरला दर्शनासाठी जाऊन आलेल्या नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावातील 24 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र हे सर्वजण गावात आल्यानंतर अनेकांच्या संपर्कात आले. अनेक ठिकाणी या 24 जणांचे जंगी स्वागत करण्यात आले, तर काही ठिकाणी सत्कार समारंभही पार पडले. मात्र यातील काहींमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्यामुळे त्यांची कोव्हिड चाचणी करण्यात आली. या चाचणीत सर्वजण कोरोनाबाधित आढळले. (24 people travel to Pandharpur by bicycle, 180 people affected by covid-19)

धक्कादायक म्हणजे या 24 जणांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 180 ते 190 गावकऱ्यांचे कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे, तर खबरदारी म्हणून संपूर्ण गाव पुढील दोन ते तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जगभरातील अनेक देशांमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणातून सूटत आहे. देशातील परिस्थिती सध्या जरी प्रशासनाच्या निंयत्रणात आहे, असे वाटत असले तरी नाशिकसारख्या घटनांमुळे परिस्थिती बिघडत आहे. 24 जणांमुळे आता संपूर्ण गाव बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

जगभरात आतापर्यंत 7 कोटी 98 लाख कोरोनाबाधितांची नोंद

वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 7 कोटी 98 लाख 31 हजार 138 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 5 कोटी 62 लाख 17 हजार 104 रुग्ण बरे झाले आहेत, तर 17 लाख 51 हजार 341 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 2 कोटी 18 लाख 62 हजार 581 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

भारतात 2 लाख 82 हजार सक्रिय कोरोनाबाधित

आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 91 लाख 11 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1 कोटी 12 लाख 19 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत, तर 3 लाख 37 हजार 66 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 1 कोटी 1 लाख 47 हजार 468 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 97 लाख 17 हजार 834 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 47 हजार 128 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या 2 लाख 82 हजार 506 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. भारतातील कोरोनाबाधितांबाबतची ही आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 19 लाख बाधितांची नोंद

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य सर्वात वर आहे. राज्यात आतापर्यंत 19 लाख 9 हजार 951 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 18 लाख 4 हजार 871 रुग्ण बरे झाले आहेत, तर 49 हजार 58 बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

कोरोनाचा नवा अवतार आशियात धडकला, पहिला रुग्ण सापडला

New Strain of Coronavirus : ब्रिटनच नाही तर ‘या’ देशांतही आढळली कोरोनाची नवी प्रजाती, भारताची स्थिती काय?

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

(24 people travel to Pandharpur by bicycle, 180 people affected by covid-19)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.