AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Earthquake : लडाखला भूकंपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल

नवी दिल्ली : एप्रिल महिन्यात सलग तीनदी लडाख ला भूकंपाचे (Earthquake) धक्के बसल्यानंतर आता पुन्हा येथे भूंकप झाला आहे. लडाखच्या कारगिलमध्ये (Kargil) तीन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी पुन्हा एकदा भूकंपामुळे कारगिल हादरले. येथे यावेळी 4.2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता जास्त नसली तरी दुपारी 2.35 च्या सुमारास हा भूकंप […]

Earthquake : लडाखला भूकंपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल
लडाख ला भूकंपाचे धक्के Image Credit source: tv9
| Updated on: Apr 24, 2022 | 4:28 PM
Share

नवी दिल्ली : एप्रिल महिन्यात सलग तीनदी लडाख ला भूकंपाचे (Earthquake) धक्के बसल्यानंतर आता पुन्हा येथे भूंकप झाला आहे. लडाखच्या कारगिलमध्ये (Kargil) तीन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी पुन्हा एकदा भूकंपामुळे कारगिल हादरले. येथे यावेळी 4.2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता जास्त नसली तरी दुपारी 2.35 च्या सुमारास हा भूकंप झाल्याचे कळत आहे. तर या भूकंपामुळे येथे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त आलेले नाही. यापूर्वी लडाखमध्येही (Ladakh) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. 6 एप्रिलला लडाखमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. हे धक्के कारगिलच्या उत्तरेस 328 किमी अंतरावर जाणवले होते. त्यानंतर 18 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड भागात आज पुन्हा 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. जो मध्यरात्री 12.59 वाजता झाला होता.

कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के

त्यानंतर 22 एप्रिललाही लडाखच्या कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली होती की, संध्याकाळी 6.50 च्या सुमारास येथे भूकंप झाला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 मोजली गेली.

 5 फेब्रुवारीला बसले होते उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके

दिल्ली, दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाबसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके 5 फेब्रुवारी 2022 ला जाणवले होते. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील हिंदूकुश येथे होता. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक भयभीत झाले. भूकंपामुळे तब्बल 15 ते 20 सेकंद जमीन हलली. अचानक घरातील वस्तू हलू लागल्याने भेदरलेल्या नागरिकांनी जीव मुठीत घेऊन तात्काळ घरातून पलायन केले. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनाही तात्काळ घराबाहेर काढण्यात आलं. अचानक धरणी हल्ल्याने अनेक लोक घाबरलेले दिसत होते. भूकंपाचे धक्के बसल्यानंतरही अनेक लोक भीतीपोटी बराच वेळ घराबाहेरच आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले.

इतर बातम्या :

UP Murder : उत्तर प्रदेशात संपत्तीच्या वादातून मुलाकडून पित्याची हत्या, आरोपी फरार

PM Modi Jammu Kasmir Visit : जम्मू आणि काश्मीरची जनता पंचायती राजपासून वंचित होती, अनुच्छेद ३७० हटवून तुम्हाला ताकद दिली

BJP MP Sakshi Maharaj : ‘पोलीस वाचवायला येणार नाहीत, घरात बाण ठेवा’, भाजप खासदार साक्षी महाराजांनी सुचवले ‘सुरक्षेचे उपाय’

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.