AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिनेव्हा करार नाही, या पाच गोष्टींमुळे अभिनंदन यांची सुटका ऐतिहासिक!

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं भारतीय भूमीत झालंय. पाकिस्तानच्या ताब्यातून एखाद्या सैनिकाची काही तासात सुटका हा भारताचा ऐतिहासिक विजय आहे. इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय की जेव्हा 48 तासात सैनिकाची सुटका करण्यात आली. हातात तिरंगा घेऊन भारताच्या या वीरपुत्राचं स्वागत वाघा बॉर्डरवर करण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका […]

जिनेव्हा करार नाही, या पाच गोष्टींमुळे अभिनंदन यांची सुटका ऐतिहासिक!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं भारतीय भूमीत झालंय. पाकिस्तानच्या ताब्यातून एखाद्या सैनिकाची काही तासात सुटका हा भारताचा ऐतिहासिक विजय आहे. इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय की जेव्हा 48 तासात सैनिकाची सुटका करण्यात आली. हातात तिरंगा घेऊन भारताच्या या वीरपुत्राचं स्वागत वाघा बॉर्डरवर करण्यात आलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका बीटिंग रिट्रीट दरम्यान सायंकाळी करावी, अशी पाकिस्तानची इच्छा होती. पण भारताने दुपारीच त्यांना सोडण्यात यावं, अशी स्पष्ट मागणी केली. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी स्पष्ट केलं, की अभिनंदन यांची सुटका दुपारी अटारी-वाघा बॉर्डरवर केली जाईल.

एखाद्या देशाकडून सैनिकाची एवढ्या कमी वेळात सुटका करण्याची ही पहिलीच वेळ आहे. निवृत्त मेजर जनरल अशोक मेहता यांनी आज तकशी बोलताना सांगितलं, की सैन्य अधिकाऱ्याला 36 ते 48 तासात सोडण्याची इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कारगिल युद्धाच्या वेळीत पायलट नचिकेत यांना पाकिस्तानकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेसाठी आठ दिवस लागले होते.

जिनेव्हा कराराचा परिणाम नाही

अभिनंदन यांची सुटका हे जिनेव्हा कराराचं यश असल्याचं सांगितलं जातंय. पण जिनेव्हा संधी लागू कधी होते याचेही काही नियम आहेत. दोन देशांनी युद्धाची घोषणा केलेली असते तेव्हा जिनेव्हा करार लागू होतो. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे याला जिनेव्हा संधी अंतर्गत पाहिलं जाऊ शकत नाही, असं माजी अधिकाऱ्यांचं मत आहे.

पुलवामा हल्ल्यापासून खंबीरपणे भारताच्या सोबत असलेल्या अमेरिकेचीही यामध्ये मोठी भूमिका आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेने इम्रान खान यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत घोषणा केली होती, की आम्ही शांततेच्या दृष्टीने पाऊल म्हणून अभिनंदन यांची सुटका करत आहोत.

27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. या विमानांना हुसकावून लावताना अभिनंदन यांच्या मिग 21 या विमानाचा अपघात झाला आणि ते पॅराशूटच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. विशेष म्हणजे अभिनंदन यांनी पाकिस्तानचं अत्याधुनिक F-16 हे विमान पाडलं.

अभिनंदन यांना सोडण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबावही होता. कारण, भारताने पाकिस्तानविरुद्ध नाही, तर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्याचा बदला म्हणून एका पायलटला अटक करणं हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची गोची करणारं ठरु शकलं असतं. म्हणून भारताच्या परराष्ट्र धोरणाचा यामध्ये विजय झाला.

व्हिडीओ पाहा :

Follow Us
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
....पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...