पालघर : कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाली. या दरम्यान होणारी ससेहोलपट टाळण्यासाठी अनेक मजूर आपल्या घराकडे निघाले आहेत. वाहनांना बंदी असल्याने हे मजूर पाईच प्रवास करत आहेत. विरारमध्ये या मजूरांची हीच घरी जाण्याची ओढ जीवावर बेतली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर पायी निघालेल्या 7 जणांना एका टेम्पोने उडवलं. या भीषण अपघात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत (Accident of labours amid corona LockDown).