AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नाही, कॉल करणाऱ्या शेतकऱ्याला अजित पवारांचं उत्तर

अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने पाण्याच्या प्रश्नावर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच कॉल केला (Farmers call to Ajit Pawar).

मी वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नाही, कॉल करणाऱ्या शेतकऱ्याला अजित पवारांचं उत्तर
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 31, 2020 | 10:42 PM
Share

अहमदनगर : राज्यभरात मान्सुनच्या आगमनापूर्वी उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने पाण्याच्या प्रश्नावर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच कॉल केला (Farmers call to Ajit Pawar). या शेतकऱ्याने अजित पवार यांच्याकडे ऊस जळून जात असल्याची व्यथा सांगत कुकडी प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी केली. यावर अजित पवार यांनी आपण कुठल्याही वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नसल्याचं स्पष्ट करत जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलायला सांगितले.

या शेतकऱ्याचा आणि अजित पवार यांच्या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या क्लिपमधील शेतकऱ्याचं नाव मारुती भापकर असं आहे. ते अजित पवार यांना म्हणाले, “मी श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा या गावातील रहिवासी आहे. राहुल जगताप यांच्या गावाशेजारीच माझं गाव आहे. कुकडीचं आवर्तन आणखी 15 दिवसांनी सोडणार म्हणत आहेत. मात्र, ऊस आणि इतर बाकीची पिकं जळून चालली आहेत. ”

यावर अजित पवार म्हणाले, “हे खातं माझ्याकडं नाही, जयंत पाटील यांच्याकडं आहे. त्यांनी याची बैठक घेतली होती. ज्यावेळी माझे सहकारी, माझे प्रांताध्यक्ष बैठक घेतात त्यावेळी मी त्यात जास्त लुडबुड करत नाही. जयंत पाटील यांना बोलावं लागेल. राहुल जगताप यांना जयंत पाटील यांच्याशी बोलण्यास सांगा.”

यानंतर संबंधित शेतकऱ्याने अजित पवार यांना तुम्ही हस्तक्षेप करा असं म्हटलं. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टपणे नकार देत सांगितलं, “जयंत पाटील यांनी 15 दिवसांपूर्वीच कुकडी प्रकल्पाची बैठक घेतली आहे. त्यात त्यांनी याविषयी काही निर्णय घेतले आहेत. जयंत पाटील हे पदाने माझे वरिष्ठ आहेत. हे खातं जर जयंत पाटील यांच्याकडे नसतं, इतर कुणाकडे असतं तर मी सांगितलं असतं.”

हेही वाचा :

Lockdown 5.0 : महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती, मात्र या 9 गोष्टींवरील बंदी कायम

Maharashtra Mission Begin Again | तीन टप्प्यात शिथिलता येणार, कोणत्या टप्प्यात काय सुरु?

Maharashtra Lockdown Guideline | महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन 5 ची नियमावली, शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार

CM Uddhav Thackeray | महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद? आरोग्य, शिक्षण ते आपत्ती सज्जता, मुख्यमंत्र्यांचे सर्व महत्वाचे मुद्दे

Farmers call to Ajit Pawar

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक