AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arnab Goswami | अर्णव गोस्वामी प्रकरण : न्यायालयात नेमकं काय घडलं?

अर्णव गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

Arnab Goswami | अर्णव गोस्वामी प्रकरण : न्यायालयात नेमकं काय घडलं?
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Nov 05, 2020 | 9:13 AM
Share

अलिबाग : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळली. अर्णव गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यानंतर अर्णव गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी यावर सुनावणी होणार. त्यांच्यावर लावण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे (Alibaug Court Sent Arnab Goswami To Judiacial Custody).

या प्रकरणातील अन्य आरोपी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अन्वय नाईक प्रकरणात न्यायालयात नक्की काय झालं?

अलिबाग पोलिसांनी सकाळच्या सत्रात साडे 12 वाजता अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर केलं.

अर्णव गोस्वामीच्या वकिलांचा युक्तिवाद

आमच्या आशीलाला कोणतीही पूर्वसूचना न देता घरात घुसून अटक केलेली आहे. हे सगळं करताना त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली. त्यामध्ये त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या. त्यामुळे पोलिसविरोधात तक्रार दाखल केली

न्यायाधीशांचे आदेश

आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन अहवालासाहित दुपारनंतरच्या सत्रात पुन्हा कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिली. संध्याकाळनंतरच्या सत्रात 5 वाजता अर्णव गोस्वामी आणि त्यानंतर इतर दोन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले.

न्यायाधीशांनी मारहाणीची तक्रार फेटाळली

आरोपीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पाहिल्यानंतर तसेच वैद्यकीय अधिक्षकांचे मत जाणून घेतल्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचे स्पष्ट होत नसल्याने तक्रार फेटाळली.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांनी केलेल्या आत्महत्येस या प्रकरणातील तीनही आरोपी जबाबदार आहेत. याबाबतचा रीतसर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा योग्य तपास झाला नाही. म्हणून केस रीओपन होऊन नव्याने तपास सुरु केला. त्यामध्ये प्राथमिक चौकशीत सकृतदर्शनी पुरावे संबंधित आरोपींच्या विरोधात पोलिसाकडे आहेत. त्यामुळे अधिक तपासासाठी आणि चौकशीसाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

अर्णव गोस्वामींच्या वकिलांचा युक्तीवाद

मे 2018 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात 2 वर्षात तपासादरम्यान पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे या आरोपीवर कारवाई न करता उलट याच पोलिसांनी माननीय न्यायालयात प्रकरण बंद करण्याचा (क्लोजर रिपोर्ट) देऊन हे प्रकरण संपुष्टात आणले होते. त्यामुळे यामध्ये नव्याने कोणतेही पुरावे पोलिसांकडे नाहीत. केवळ आकसापोटी सूडबुद्धीने ही कारवाई केली असल्याने तसेच आरोपींकडून कोणतीही रिकव्हरी नसल्याने पोलीस कोठडीची गरज नाही (Alibaug Court Sent Arnab Goswami To Judiacial Custody).

न्यायाधीशांनी काय निर्णय दिला?

दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पोलीस कोठडीसाठी आवश्यक असणारे मुद्दे तसेच पुरावे पोलिसांनी यावेळी न्यायालयासमोर सादर केलेले दिसत नाहीत. त्याचसोबत क्लोजर रिपोर्टनंतर यावर सुनावणी किंवा फेरतपासणीची कोणतीही कारवाई झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नाही. यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता वाटत नाही, असं न्यायाधीशांनी सांगितलं. या सगळ्या सुनावणीनंतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

अर्णव गोस्वामींकडून गौरव पारकर तर अन्वय नाईक यांच्याकडून विलास नाईक यांनी न्यायालयात बाजू मांडली.

Alibaug Court Sent Arnab Goswami To Judiacial Custody

संबंधित बातम्या:

Arnab Goswami Arrest | अर्णव गोस्वामी यांना अटक झाली तो क्षण, घरात नेमकं काय घडलं?

अर्णव गोस्वामी ‘उसूलों पे चला होगा’; अमृता फडणवीसांकडून पाठराखण

‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’, शिवसेनेचा टोला!, तर ‘पोपट आम्ही नाही, शिवसेनाच पाळते’, भाजपचं प्रत्युत्तर

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या