AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अँटीबायोटिकमुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांचा मृत्यू

मुंबई : अँटीबायोटिक औषधांचा वापर सध्या देशात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांना आपला जीव गमवावा लागत आहे, असा अहवाल सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स इकोनॉमिक्स पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने सादर केला. शहरांतील कचरा आणि सांडपाणी यामुळेही पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. रविवारी झालेल्या जागतिक ‘अँटीबायोटिक जागरुकता सप्ताह’च्या […]

अँटीबायोटिकमुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

मुंबई : अँटीबायोटिक औषधांचा वापर सध्या देशात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांना आपला जीव गमवावा लागत आहे, असा अहवाल सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स इकोनॉमिक्स पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने सादर केला. शहरांतील कचरा आणि सांडपाणी यामुळेही पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. रविवारी झालेल्या जागतिक ‘अँटीबायोटिक जागरुकता सप्ताह’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा अहवाल सीडीडीईपी संस्थेने सादर केला.

दरवर्षी जगभरात सात लाख लोक अँटीबायोटिकच्या सेवनामुळे आपला जीव गमावत आहेत. एकट्या भारतात तब्बल 58 हजार लोक आपला जीव गमावत असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. हा आकडा खरंच गंभीर आहे. शहरातील कचरा, दुषित पाणी यांमुळे अनेक आजार पसरत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिकचा वापर वाढला आहे.

सीडीडीईपीच्या संशोधनानुसार 2000 सालापासून ते 2015 पर्यंत अँटीबायोटिकचा वापर 65 टक्क्यांनी वाढला आहे. तर कमी उत्पन्न असलेल्या देशांत याचा वापर हा 114 टक्क्यांनी वाढलेला आहे. भारतामध्ये याचे प्रमाण 103 टक्क्यांनी वाढले आहे, असे सीडीडीईपीचे दक्षिण आशियाचे प्रमुख ज्योती जोशी यांनी यावेळी सांगितले.

भारत जगाची फार्मसी म्हणून ओळखली जाते. गंभीर औषधांच्या अग्रगण्य उत्पादकांमध्ये ज्यात अँटीबायोयिक्सचा समावेश आहे, अशा औषांधाच्या उत्पादनामुळे नद्यांचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसाना होत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

काय आहे अँटीबोयटिक?

अँटीबायेटिक एक असे औषध आहे जे जीवाणूंना नष्ट करते आणि त्यांना वाढण्यापासून रोखते. याचा उपयोग सुक्ष्मदर्शी जीवाणूंमुळे होणाऱ्या आजारावेळी केला जातो. बॅक्टेरिया जर आपल्या शरीरात असतील, तर त्यांच्याशी लढण्यासाठी या औषधांचा वापर केला जातो. हा पण अँटीबायोटिक औषधांचे सेवन अति प्रमाणात करणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून धोकादायक ठरु शकते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.