AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अँटीबायोटिकमुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांचा मृत्यू

मुंबई : अँटीबायोटिक औषधांचा वापर सध्या देशात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांना आपला जीव गमवावा लागत आहे, असा अहवाल सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स इकोनॉमिक्स पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने सादर केला. शहरांतील कचरा आणि सांडपाणी यामुळेही पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. रविवारी झालेल्या जागतिक ‘अँटीबायोटिक जागरुकता सप्ताह’च्या […]

अँटीबायोटिकमुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांचा मृत्यू
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

मुंबई : अँटीबायोटिक औषधांचा वापर सध्या देशात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांना आपला जीव गमवावा लागत आहे, असा अहवाल सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स इकोनॉमिक्स पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने सादर केला. शहरांतील कचरा आणि सांडपाणी यामुळेही पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. रविवारी झालेल्या जागतिक ‘अँटीबायोटिक जागरुकता सप्ताह’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा अहवाल सीडीडीईपी संस्थेने सादर केला.

दरवर्षी जगभरात सात लाख लोक अँटीबायोटिकच्या सेवनामुळे आपला जीव गमावत आहेत. एकट्या भारतात तब्बल 58 हजार लोक आपला जीव गमावत असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. हा आकडा खरंच गंभीर आहे. शहरातील कचरा, दुषित पाणी यांमुळे अनेक आजार पसरत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिकचा वापर वाढला आहे.

सीडीडीईपीच्या संशोधनानुसार 2000 सालापासून ते 2015 पर्यंत अँटीबायोटिकचा वापर 65 टक्क्यांनी वाढला आहे. तर कमी उत्पन्न असलेल्या देशांत याचा वापर हा 114 टक्क्यांनी वाढलेला आहे. भारतामध्ये याचे प्रमाण 103 टक्क्यांनी वाढले आहे, असे सीडीडीईपीचे दक्षिण आशियाचे प्रमुख ज्योती जोशी यांनी यावेळी सांगितले.

भारत जगाची फार्मसी म्हणून ओळखली जाते. गंभीर औषधांच्या अग्रगण्य उत्पादकांमध्ये ज्यात अँटीबायोयिक्सचा समावेश आहे, अशा औषांधाच्या उत्पादनामुळे नद्यांचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसाना होत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

काय आहे अँटीबोयटिक?

अँटीबायेटिक एक असे औषध आहे जे जीवाणूंना नष्ट करते आणि त्यांना वाढण्यापासून रोखते. याचा उपयोग सुक्ष्मदर्शी जीवाणूंमुळे होणाऱ्या आजारावेळी केला जातो. बॅक्टेरिया जर आपल्या शरीरात असतील, तर त्यांच्याशी लढण्यासाठी या औषधांचा वापर केला जातो. हा पण अँटीबायोटिक औषधांचे सेवन अति प्रमाणात करणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून धोकादायक ठरु शकते.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.