अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान, औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याचा गळफास

औरंगाबादेतील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे आत्महत्या केली आहे. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. (Aurangabad Young Farmer Suicide)

अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान, औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याचा गळफास
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 9:19 AM

औरंगाबाद : औरंगाबादेतील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्याने त्याने आत्महत्या केली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी गावात ही घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. (Aurangabad Young Farmer Suicide)

सुरेश रावसाहेब जंजाळ असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 37 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्याने आत्महत्या केली आहे. काल (23 सप्टेंबर) दुपारी 2 वाजता त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

अनेक भागातील शेतकरी चिंताग्रस्त 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गावोगावी शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

गेल्या वर्षी पडलेला दुष्काळ, यंदा सततचा पाऊस यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही शेतकरी नापिकीला तर काही जण बँकेतील कर्ज फेडण्याची चिंता आहे. त्यात शेतमालालाही योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलं असताना मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले. तसेच अनेक पिकांवर रोगाचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.(Aurangabad Young Farmer Suicide)

संबंधित बातम्या : 

काटेकोर इशारा, बिनचूक अंदाज, श्रेयापासून वंचित हवामान विभाग

कुटुंबात गृहिणीचं काम आव्हानात्मक, पण कौतुक नाही, कोर्टाने घेतली ‘तिची’ दखल

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.