AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी वाढ, जगाला टाकले मागे, 2 वर्ष आसपासही नाही

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. IMF नंतर आशियाई विकास बँकेनेही भारताचा विकास दर 7 टक्के केला आहे. भारताचा विकासदर केवळ या वर्षीच नव्हे तर पुढील वर्षीही सर्वोच्च असेल, असा विश्वास एडीबीने व्यक्त केला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी वाढ, जगाला टाकले मागे, 2 वर्ष आसपासही नाही
indian economyImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 17, 2024 | 6:02 PM
Share

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नंतर आता आशियाई विकास बँकेने (ADB) देखील भारतीय वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. भारताचा विकास दर जगात सर्वात वेगवान असल्याचा दावा सर्व संस्था आणि रेटिंग एजन्सी यांनी केला आहे. केवळ चालू आर्थिक वर्षातच नाही तर पुढील आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढेल. यासोबतच ADB ने ही विकास दराचा अंदाज दिला आहे. आशियाई विकास बँकेने (ADB) चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 7 टक्के इतका वर्तविला आहे.

सामान्य मान्सूनच्या अंदाजापेक्षा चांगला पाऊस पाहता भारताच्या कृषी क्षेत्रात सुधारणा अपेक्षित आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने भारताचा GDP वाढीचा अंदाज 7 टक्के केला अशावेळीच ADB चा अंदाज आल्याने त्याला फार महत्व आहे. IMF ने भारताच्या वाढीचा अंदाज 0.2 टक्क्यांनी वाढवला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेनेही विकासदराच्या अंदाजात बदल केला होता.

आरबीआयने चालू आर्थिक वर्षाचा विकासदर 7 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. याचा अर्थ RBI आणि IMF या दोघांनीही त्यांच्या वाढीचा अंदाज 0.2 टक्क्यांनी वाढवला आहे. एशियन डेव्हलपमेंट आउटलुक (ADO) च्या जुलैच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2024-25 (31 मार्च 2025 रोजी समाप्त) या आर्थिक वर्षात 7 टक्के दराने वाढेल. एप्रिल 2024 मध्ये ADO च्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 7.2 टक्के दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 8.2 टक्के वाढ नोंदवली, जी मागील आर्थिक वर्ष 2022-23 मधील 7 टक्के होती. या अहवालात असे म्हटले आहे की, सामान्य मान्सूनच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मंद वाढ झाली. यामुळे कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा अपेक्षित आहे. जूनमध्ये मान्सूनची प्रगती मंदावली असली तरी ही स्थिती समाधानकारक आहे. ग्रामीण भागातील विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी कृषी क्षेत्रातील सुधारणा महत्त्वाची ठरणार आहे.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?