AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायेब, आज तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती; अपसिंगाच्या शेतकऱ्याला फडणवीसांसमोर अश्रू अनावर

सायेब.. आभाळच फाटलं ओ... तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती... सायेब, आता तुम्हीच काय तरी करा...'' असा आर्त टाहो आपसिंगा गावच्या शेतकऱ्याने फोडला. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही स्तब्ध झाले.

सायेब, आज तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती; अपसिंगाच्या शेतकऱ्याला फडणवीसांसमोर अश्रू अनावर
| Updated on: Oct 20, 2020 | 12:39 PM
Share

तुळजापूर: “कधी पाहिला नव्हता असा पाऊस झाला. या पावसानं आमच्या घरांची पडझड झाली. जनावरं वाहून गेली. शेतातली पिकंही उद्ध्वस्त झाली… आता कशाचा कशाचाच आधार राहिला नाही. आमच्याकडे कोणी फिरकत नाही. सायेब.. आभाळच फाटलं की ओ… तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती… सायेब, आता तुम्हीच काय तरी करा…” असा आर्त टाहो आपसिंगा गावच्या शेतकऱ्याने फोडला. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही स्तब्ध झाले. शेतकऱ्यांची ही केविलवाणी अवस्था पाहून काय बोलावे या विचारात फडणवीस पडले. फडणवीस यांच्याप्रमाणे त्यांच्यासोबत असलेल्या सर्वच पुढाऱ्यांची ही अवस्था झाली होती. (Devendra Fadnavis visits flood-hit osmanabad)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कालपासून अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. काल बारामतीतील शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची पाहणी केल्यानंतर आज तुळजापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपसिंगा गावात फडणवीसांचा ताफा येताच शेतकरी भराभर त्यांच्या भोवती जमा झाले. कोण आपल्या उद्ध्वस्त झालेल्या शेताकडे या म्हणू लागला तर कोण आपलं जमीनदोस्त घर पाहण्याची विनंती करू लागला. तर, काही शेतकरी झालेल्या नुकसानाची माहिती देऊन मदत करण्याची विनंती करू लागले. एका शेतकऱ्यालाही फडणवीसांशी बोलताना अश्रू अनावर झाले. आता तुम्हीच काही तरी करा. तुम्ही आज असता तर काही तरी मदत झाली असती. माझं सगळं घर दूधावर होतं. आता जनावरच वाहू गेली. कसा जगू मी?, असा सवाल या शेतकऱ्याने करत धायमोकलून रडायला सुरुवात केली.

तर, दुसऱ्या शेतकऱ्याने शेतातील पिकं वाहून गेली. आता शेतात फक्त दगडगोटे उरले आहेत. काय खावं आम्ही. आता पाच वर्ष शेती ओस पडणार. कसं जगायचं?, असा सवाल करत या शेतकऱ्यानेही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवं होती. त्यामुळे फडणवीसही गहिवरून गेले. काही काळ स्तब्ध झाल्यानंतर त्यांनी या शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवत काळजी करू नका. मी तुमच्या सोबत आहे, असा धीर दिला. मुख्यमंत्र्यांकडे तुमची गाऱ्हाणी मांडणार असल्याचंही त्यांना सांगितलं. त्यांची निवेदन घेतली. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे किती झाले. शेतमालाचे किती नुकसान झालं. किती लोक बाधित आहेत, याची माहिती घेतली. (Devendra Fadnavis visits flood-hit osmanabad)

संबंधित बातम्या:

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना गुरुवारी मोठा दिलासा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची tv9 ला माहिती

फडणवीसांकडून ‘लाव रे तो व्हिडीओ’!, जुने दाखले देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

(Devendra Fadnavis visits flood-hit osmanabad)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...