AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायेब, आज तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती; अपसिंगाच्या शेतकऱ्याला फडणवीसांसमोर अश्रू अनावर

सायेब.. आभाळच फाटलं ओ... तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती... सायेब, आता तुम्हीच काय तरी करा...'' असा आर्त टाहो आपसिंगा गावच्या शेतकऱ्याने फोडला. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही स्तब्ध झाले.

सायेब, आज तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती; अपसिंगाच्या शेतकऱ्याला फडणवीसांसमोर अश्रू अनावर
| Updated on: Oct 20, 2020 | 12:39 PM
Share

तुळजापूर: “कधी पाहिला नव्हता असा पाऊस झाला. या पावसानं आमच्या घरांची पडझड झाली. जनावरं वाहून गेली. शेतातली पिकंही उद्ध्वस्त झाली… आता कशाचा कशाचाच आधार राहिला नाही. आमच्याकडे कोणी फिरकत नाही. सायेब.. आभाळच फाटलं की ओ… तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती… सायेब, आता तुम्हीच काय तरी करा…” असा आर्त टाहो आपसिंगा गावच्या शेतकऱ्याने फोडला. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही स्तब्ध झाले. शेतकऱ्यांची ही केविलवाणी अवस्था पाहून काय बोलावे या विचारात फडणवीस पडले. फडणवीस यांच्याप्रमाणे त्यांच्यासोबत असलेल्या सर्वच पुढाऱ्यांची ही अवस्था झाली होती. (Devendra Fadnavis visits flood-hit osmanabad)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कालपासून अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. काल बारामतीतील शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची पाहणी केल्यानंतर आज तुळजापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपसिंगा गावात फडणवीसांचा ताफा येताच शेतकरी भराभर त्यांच्या भोवती जमा झाले. कोण आपल्या उद्ध्वस्त झालेल्या शेताकडे या म्हणू लागला तर कोण आपलं जमीनदोस्त घर पाहण्याची विनंती करू लागला. तर, काही शेतकरी झालेल्या नुकसानाची माहिती देऊन मदत करण्याची विनंती करू लागले. एका शेतकऱ्यालाही फडणवीसांशी बोलताना अश्रू अनावर झाले. आता तुम्हीच काही तरी करा. तुम्ही आज असता तर काही तरी मदत झाली असती. माझं सगळं घर दूधावर होतं. आता जनावरच वाहू गेली. कसा जगू मी?, असा सवाल या शेतकऱ्याने करत धायमोकलून रडायला सुरुवात केली.

तर, दुसऱ्या शेतकऱ्याने शेतातील पिकं वाहून गेली. आता शेतात फक्त दगडगोटे उरले आहेत. काय खावं आम्ही. आता पाच वर्ष शेती ओस पडणार. कसं जगायचं?, असा सवाल करत या शेतकऱ्यानेही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवं होती. त्यामुळे फडणवीसही गहिवरून गेले. काही काळ स्तब्ध झाल्यानंतर त्यांनी या शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवत काळजी करू नका. मी तुमच्या सोबत आहे, असा धीर दिला. मुख्यमंत्र्यांकडे तुमची गाऱ्हाणी मांडणार असल्याचंही त्यांना सांगितलं. त्यांची निवेदन घेतली. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे किती झाले. शेतमालाचे किती नुकसान झालं. किती लोक बाधित आहेत, याची माहिती घेतली. (Devendra Fadnavis visits flood-hit osmanabad)

संबंधित बातम्या:

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना गुरुवारी मोठा दिलासा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची tv9 ला माहिती

फडणवीसांकडून ‘लाव रे तो व्हिडीओ’!, जुने दाखले देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

(Devendra Fadnavis visits flood-hit osmanabad)

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.