AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनगर आरक्षणासाठी पडळकर आक्रमक, सरकारला रक्ताच्या 10 हजार बाटल्या पाठवणार

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे वेगळं आंदोलन सुरु झालं आहे. (BJP MLA Gopichand Padalkar on Dhangar Reservation) 

धनगर आरक्षणासाठी पडळकर आक्रमक, सरकारला रक्ताच्या 10 हजार बाटल्या पाठवणार
| Updated on: Oct 04, 2020 | 1:32 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाचे राजकारण्यांनी आतापर्यंत फक्त राजकीय शोषण, रक्तशोषण केले. पण आरक्षणासाठी धनगर समाज आता शोषण करणाऱ्या सरकारलाच रक्तादानच्या हजारो बाटल्या देणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे वेगळं आंदोलन सुरु झालं आहे. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. (BJP MLA Gopichand Padalkar on Dhangar Reservation)

धनगर समाजाने आरक्षणासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने केली आहे. प्रत्येक पक्षाने आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी या समाजाला वापरले. त्यांचे राजकीय शोषण केले. अनेक ठिकाणी मेंढपाळावर हल्ले झाले. त्यांच्या रक्त शोषण केले.

संविधानाने जे दिलं आहे ते फक्त द्या, एवढीच मागणी धनगर समाज करतो आहे. पण सत्ताधारी लोक लक्ष देत नाहीत. यासाठीच 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या काळात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात रक्तदानाची चळवळ सुरू झाली आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रक्तदान केलेल्या 10 हजार बाटल्या राज्य सरकारकडे देणार आहेत. हे रक्त राज्यातील गरजूंना उपयोगी तर पडेलच, पण या माध्यमातून सरकारने आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे हा आग्रह असणार आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. (BJP MLA Gopichand Padalkar on Dhangar Reservation)

संबंधित बातम्या : 

‘देऊळ बंद’, मात्र शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांची गर्दी

Amol Kolhe | महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत, अमोल कोल्हेंचा सवाल

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.