Independence Day : पाच वर्षात जनतेची सेवा अव्याहतपणे केली, पुढेही करु : मुख्यमंत्री

देशभरात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं.

Independence Day : पाच वर्षात जनतेची सेवा अव्याहतपणे केली, पुढेही करु : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Aug 15, 2019 | 9:37 AM

Independence Day मुंबई : देशभरात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्य प्रधान सचिव, माजी प्रधान सचिव, विविध विभागाचे सचिव, इतर सनदी अधिकारी, आजी-माजी आमदार आणि पोलिस दलाचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहिले.

दरम्यान, मानवंदना देण्यासाठी खास गुजरात पोलिसांचीही तुकडी आली. यासोबतच बृहन्मुंबई पोलिसांची तुकडी आणि एसआरपी अशा तीन तुकड्यांनी सलामी दिली.

मुख्यमंत्र्यांचं भाषण

“आजचा स्वातंत्र्य दिन अनोखा असा आहे. लढाख, काश्मीरमध्ये आज शांततेत तिरंगा फडकावला गेला. आज राज्यात पूरपरिस्थिती आहे. सरकारने आणि इतर सर्व यंत्रणांनी प्रचंड परिश्रम करुन पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेले. आता आपल्यासमोर आव्हान आहे, ज्याचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांना उभे करण्याचे काम सरकारला करावे लागेल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्राकडे पूरग्रस्तांसाठी मदत

केंद्र सरकारकडे 6 हजार 800 कोटींच्या पॅकेजची मागणी केली आहे. त्यातून आम्हाला विकास करायचा आहे. पूरग्रस्तांचे पुनर्वसन वेळेत करु. अनेकजण पूरग्रस्तांच्या पाठीशी आणि आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मी आभार व्यक्त करतो.

दुष्काळ मुक्तीसाठी प्रयत्न

सरकारने सामान्य माणसाच्या जीवनात बदल होतील यासाठी सकारात्मक प्रयत्न केला. राज्याला आम्ही जलयुक्त शिवार आणून पाण्याचा प्रश्न सोडवला. राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प आहे.  वाहून जाणारे पाणी आणायचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दुष्काळी भाग आम्ही दुष्काळ मुक्त करु.

महाराष्ट्र अग्रेसर

गेल्या पाच वर्षात राज्याला अग्रेसर करू शकलो. भक्कम केले, उद्योग, अर्थव्यवस्था भक्कम केली. वंचित समाजासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास पोहोचला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करत आहोत.

पंतप्रधान मोदींनी दिलेल्या त्रिसूत्रीवर काम चालू आहे.  गरिबांपर्यंत विकास घेऊन जाऊ. देशाच्या आर्थिक विकासात तीन ट्रिलियन व्यवस्थेत आमचा सर्वात मोठा वाटा असेल. पाच वर्षात आपली सेवा अव्याहतपणे केली, पुढेही आम्ही ती करु, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.