AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसईत कोरोनाचा विळखा, नायगाव कोळीवाड्यात आजपासून 14 दिवसांचा कडकडीत बंद

वसई-विरार महापालिकेने आजपासून 14 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे (Complete lockdown in Naygaon Koliwada of Vasai Virar).

वसईत कोरोनाचा विळखा, नायगाव कोळीवाड्यात आजपासून 14 दिवसांचा कडकडीत बंद
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 24, 2020 | 9:29 AM
Share

पालघर : कोरोना विषाणूच्या संसर्गाने मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही वेढा घातला आहे. वसईच्या नायगाव कोळीवाड्यात देखील अशीच स्थिती तयार झाली. अखेर वसई-विरार महापालिकेने या ठिकाणी आजपासून 14 दिवसांचा कडकडीत बंद लागू करण्याचा निर्णय घेतला आहे (Complete lockdown in Naygaon Koliwada of Vasai Virar). कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितलं आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.

एकट्या नायगाव कोळीवाड्यात मागील 8 ते 10 दिवसात 22 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर सोमवारी (22 जून) एका कोरोना रुग्णाचा दुर्दैवी मृत्यूही झाला. या परिसरात दाटीवाटीची लोकवस्ती आहे. सुखदुःखात एकत्र येणे, ओटीवर बसणे, समुहाने फिरणे असे सर्व प्रकार या परिसरात सुरुच असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच नायगाव कोळीवाडा परिसरातील बेसिन कॅथलिक बँक ते नायगाव स्टेशन परिसराकडील कोळीवाड्याची हद्द पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानिमित्ताने स्थानिक नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रभाग समिती (आय)चे सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यात काल (23 जून) दिवसभरात 3 हजार 214 नव्या रुगणांची नोंद झाली (Maharashtra COVID-19 Total Cases). कोरोनामुळे दिवसभरात सर्वाधिक 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 75 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत. तर, 173 जणांची नोंद गेल्या काही दिवसांमधील आहे. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या 6 हजार 531 वर पोहोचली आहे. तर सध्या राज्यात 1 लाख 39 हजार 10 कोरोनाचे रुग्ण आहेत (Maharashtra COVID-19 Total Cases).

दिवसभरात 1,925 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात काल दिवसभरात 1 हजार 925 रुग्णांची कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 69 हजार 631 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 50.09 टक्के आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 4.69 टक्के इतका आहे (Maharashtra COVID-19 Total Cases).

6 लाख 05 हजार 141 लोक होम क्वारंटाईन

राज्यात कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8 लाख 02 हजार 775 नमुन्यांपैकी 1 लाख 39 हजार 10 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 6 लाख 05 हजार 141 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या 26 हजार 572 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे 62 हजार 833 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोना नियंत्रणासाठी पुणे मनपाचा मोठा निर्णय, 1 लाख नागरिकांच्या कोरोना टेस्ट करणार

LIVE: नाशिक शहरातील शासकीय कार्यालय देखील कोरोनाच्या विळख्यात

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबळींचा नवा उच्चांक, दिवसभरात 248 जणांचा मृत्यू

Complete lockdown in Naygaon Koliwada of Vasai Virar

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक