दत्तात्रय भरणे पालकमंत्रिपदाला वैतागले ? जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी घेतली शरद पवारांची भेट

सोबतच उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकरांचा गैरसमज झाला होता. मात्र पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषय महत्वाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दत्तात्रय भरणे पालकमंत्रिपदाला वैतागले ? जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी घेतली शरद पवारांची भेट
दत्ता भरणे
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 11:43 PM

पुणे : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एका महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सोलापूरच्या पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी विनंती केली होती. तशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. सोबतच उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकरांचा गैरसमज झाला होता. मात्र पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषय महत्वाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंदापूर शहराचे नगरसेवक अमर गाडे यांच्या खडी क्रेशरच्या प्लॅटच्या उद्घाटनाच्या वेळी दत्तात्रेय भरणे बोलत होते. (Dattatray Bharane was ready to resign from Solapur guardian minister visited sharad pawar)

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्रिपदाला वैतागले होते?

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी इंदापूरचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आली. या नंतरच्या काळात उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील बावीस दुष्काळी गावांना पाच टीएमसी पाणी देण्याच्या निर्णय झाला. याचा राज्य सरकारने सर्वेक्षणाचा आदेश काढ़ल्यानंतर सोलापूरमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती.

शरद पवार आणि दत्तात्रय भरणो यांची भेट

त्यामुळे सहाजिकच दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी नाराज असल्याचे जाणवत होते. याच कारणामुळे दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एका महिन्यापूर्वी भेट घेतली होती. तसेच या भेटीत मला सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदातून मुक्त करा अशी विनंती त्यांनी केली होती.

माझ्या पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषय महत्वाचा..

उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकरांचे पाणी नसतानाही सोलापूरकरांचा गैरसमज झाला होता. मात्र पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषयही महत्वाचा असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सरळमार्गी स्वभावामुळे व हसतमुख चेहऱ्याने कार्यकर्त्यांचे स्वागत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे मंत्रिमंडळात व राज्यभरात त्यांची एक वेगळी छाप आहे परंतु सोलापूरकरांना भरणे अजून रुचलेच नाहीत का ? असा प्रश्नही निर्माण होत आहे.

इतर बातम्या :

VIDEO: “मी भुजबळ यांच्या विरोधात नाही, कुणाला वाईट वाटले असेल तर माफी मागतो”

DATTA BHARNE

DATTA BHARNE

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.