नापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने एका महिन्यात, पदवीच्या प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा नाही : उदय सामंत

विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. (Uday Samant On Final year Exam Result And Degree Certificate)

नापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने एका महिन्यात, पदवीच्या प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा नाही : उदय सामंत
. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षप्रमुख असताना जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री झाल्यावरही कायम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
Follow us
| Updated on: Sep 19, 2020 | 1:16 PM

औरंगाबाद : कोरोनामुळे रखडलेल्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचे निकाल येत्या 10 ऑक्टोबरपासून लागायला सुरुवात होईल. या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा देण्यात येणार नाही. तसेच या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. (Uday Samant On Final year Exam Result And Degree Certificate)

“अंतिम वर्षातील 1 लाख 16 हजार 400 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 90 ते 92 टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतील अशी नोंद विद्यापीठाकडे झाली आहे. तर उरलेले 10 टक्के विद्यार्थी हे स्वत: जवळच्या केंद्रात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

“जवळपास 11 हजार विद्यार्थी हे जिल्ह्याच्या विविध ठिकाणी आणि शहरात परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांना ऑफलाईन परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं आवश्यक असून योग्य ते निर्देश दिले आहेत.

तसेच Question bank, Mock test यानंतरही काही तांत्रिक अडचणीमुळे जर विद्यार्थ्यांची परीक्षा राहिली तर ती परीक्षा विद्यापीठ तातडीने घेणार आहे. म्हणजेच नापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने एका महिन्यात घेतली जाईल. त्यांनाही पदवीचे प्रमाणपत्र दिले जाईल,” असेही उदय सामंत म्हणाले.

पदवी प्रमाणपत्रांवर कोव्हिडचा शेरा नाही 

“या पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोव्हिड 19 असा कोणत्याही प्रकारचा शेरा दिला जाणार नाही. हे पदवीचे प्रमाणपत्र हे गेल्यावर्षीप्रमाणेच दिलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनात कोणाताही संभ्रम ठेवू नये.”

“या प्रमाणपत्राचा आदर हा सर्व ठिकाणी पूर्वीप्रमाणे केला पाहिजे. या पदवीकडे जर कोणी बघत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी,” असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. (Uday Samant On Final year Exam Result And Degree Certificate)

संबंधित बातम्या : 

Final Year exam | अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, महिनाअखेरपर्यंत निकाल, उदय सामंत यांची घोषणा

UGC | अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, तारखा निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.