AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाने घरातले आधारवड कोसळले, कुटुंबातील चौघांचा पाठोपाठ मृत्यू

अवघ्‍या वीस दिवसात एकापाठोपाठ एक अमृतकर परिवारातील चौघा कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कोरोनाने घरातले आधारवड कोसळले, कुटुंबातील चौघांचा पाठोपाठ मृत्यू
| Updated on: Oct 04, 2020 | 1:46 PM
Share

जळगाव : जळगावमधील एकाच कुटुंबातील चौघा पुरुषांची प्राणज्योत मालवली, त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कोरोना कारणीभूत ठरला. वीस दिवसांच्या काळात अमृतकर कुटुंबातील चौघा जणांचे निधन झाले. (Four Men in Jalgaon Family Dies after one another)

धरणगाव तालुक्यातील साखरे येथील अमृतकर कुटुंब सध्या धरणगावच्या चिंतामणी मोरया परिसरात राहते. अवघ्‍या वीस दिवसात एकापाठोपाठ एक अशा चौघा कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

साखरे (ता. धरणगाव) येथील शेती आणि खत विक्रीच्या दुकानावर आपला उदरनिर्वाह करणारे अमृतकर कुटुंब मेहनती आणि सालस म्हणून ओळखले जाते. सर्वात आधी 75 वर्षीय शांताराम गोपाल अमृतकर यांचे कोरोना सदृश आजाराने निधन झाले.

काकांनंतर 52 वर्षीय सुनील पुंडलिक अमृतकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला. जळगावच्या लोकसेवा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना 30 सप्टेंबरला त्यांचे निधन झाले. तर त्यांचे 50 वर्षीय बंधू सतीश पुंडलिक अमृतकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. जळगावच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना 1 ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुलांच्या निधनाचा धक्का

दोन मुलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने घरातील ज्येष्ठ असलेले 85 वर्षीय पुंडलिक गोपाल अमृतकर यांचीही हृदयविकाराच्या धक्क्याने प्राणज्योत मालवली. एकापाठोपाठ एक अमृतकर परिवारावर काळाने असा घाला घातला, की संपूर्ण गावच सुन्न झालं. अमृतकर कुटुंबातील तेरा सदस्‍य आनंदात राहत होते. परंतु नियतीने घाला घातल्‍याने कुटुंबाचा आधार नाहीसा झाला. गावातही सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Four Men in Jalgaon Family Dies after one another)

कुटुंबावर कर्जाचा डोंगर

शेती, व्यवसायासाठी बँका, वि. का. सोसायटी, उसनवार असे कर्ज आहे. अशावेळी घरातील महिला आणि लहान मुलांनी हा भार कसा पेलायचा, हा प्रश्न कुटुंबासमोर उभा आहे. शासनाने, समाजातील दानशूर व्यक्तींनी कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची गरज व्यक्त होत आहे.

संबंधित बातमी :

राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील यांचे निधन, दहा दिवसात कुटुंबातील तिघांना काळाने हिरावले

(Four Men in Jalgaon Family Dies after one another)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.