AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सोनिया गांधी, मायावतींना भारतरत्न द्या’, हरीश रावत यांची केंद्राकडे मागणी

राजकारण आणि समाजकारणातील महिला शक्तीचा आदर करत सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असं मत रावत यांनी व्यक्त केलं आहे.

'सोनिया गांधी, मायावतींना भारतरत्न द्या', हरीश रावत यांची केंद्राकडे मागणी
| Updated on: Jan 06, 2021 | 2:32 PM
Share

नवी दिल्ली: भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा सन्मान करावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केली आहे. राजकारण आणि समाजकारणातील महिला शक्तीचा आदर करत सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असं मत रावत यांनी व्यक्त केलं आहे. (Harish Rawat demands on Bharatratna)

हरीश रावत यांनी ट्वीट करुन केंद्र सरकारकडे ही मागणी केली आहे. ‘दोन्ही व्यक्ती या प्रखर राजकारणी आहे. त्यांच्या राजकारणाशी कुणी सहमत किंवा असहमत होऊ शकतं. पण सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांचे सामाजिक स्थान आणि सामाजिक समर्पण, तसंच जनससेवेच्या मापदंडांना नवी उंची आणि आदर मिळवून दिला आहे,’ असं रावत यांनी म्हटलंय.

रावत यांनी बसपा अध्यक्षा मायावती यांचीही जोरदार स्तुती केली आहे. ‘मायावती यांनी अनेक वर्षांपासून पीडित-शोषित वर्गाच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे. भारत सरकारने या दोन्ही व्यक्तीमत्वांचा सन्मान भारतरत्न पुरस्काराने करायला हवा,’ असंही रावत यांनी म्हटलं.

रावतांच्या मागणीवर BSP नाराज

हरिश रावत यांनी सोनिया गांधी यांच्यासह मायावतींना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. असं असलं तरी रावत यांच्या या मागणीवर बसपा नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘हरिश रावत यांची मागणी फक्त जनतेला मुर्ख बनवण्याच्या रणनितीपेक्षा वेगळी नाही’, असं मत बसपा नेते के गौतम यांनी व्यक्त केलं आहे. यापूर्वी काँग्रेस सरकार दलितांचे आयकॉन असलेले बाबासाहेब आंबेडकर यांचा उचित सन्मान करण्यात अपयशी ठरली होती. मात्र, बसपा संस्थापक काशींराम साहू आणि मायावती यांच्यासह अन्य नेत्यांनी केलेल्या मागणीनंतर ते शक्य झालं, असंही मनोज यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या:

अहंकार सोडा, राजधर्म पाळा, कृषी कायदे मागे घ्या; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्ला

तब्बल 26 वर्षांनी मायावती-मुलायम एकत्र, भेटल्यानंतर काय म्हणाले?

Harish Rawat demands on Bharatratna

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.