गुजरातला जाणारे पाणी अडवणार; जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमधील ग्रामीण भागातील पाणी योजनांची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत. (Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

गुजरातला जाणारे पाणी अडवणार; जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 4:01 PM

नाशिक: राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमधील ग्रामीण भागातील पाणी योजनांची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत. शिवाय गुजरातला वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावाही जयंत पाटील घेणार आहेत. (Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने पावसाचे हे पाणी गुजरातला वाहून जाते. हे पाणी गिरणा आणि गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून त्याचाच आढावा जयंत पाटील आजच्या नाशिक दौऱ्यात घेत आहेत. त्यांनी आज त्रिभूवन या आदिवासी बहुल भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी आमदार नितीन पवार, जे. पी. गावित यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित त्रिभूवन धरणासाठीची जागा संपादित करण्यात आली आहे, असं सांगतानाच स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न आधी सोडवणार, त्यानंतरच इतरत्र पाणी वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात हळूहळू सर्व उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे राज्याची तिजोरीही लवकरच भरेल, असं सांगतानाच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पाणी आडवा, वळवा आणि शेतीला द्या

दरम्यान, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी पाटील यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. येथील शेतामध्ये नागलीचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. या भागात सर्वाधिक पाऊस पडतो पण तरीही शेतीला पुरेसं पाणी मिळत नाही. या भागात नॅचरल फिल्टर असलेलं पाणी आहे. त्यामुळे पाणी आडवा, वळवा आणि शेतीला द्या, अशी मागणी झिरवळ यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

शिवाजी पार्कवर शपथ घेऊन एक वर्ष पूर्ण, पुढची चार वर्षं कशी जातील ते भाजपला कळणार नाही : जयंत पाटील

मंदिरं उघडण्याची ‘हीच ती वेळ’, सरकार पुढील चार वर्ष दिवाळी साजरी करणार : जयंत पाटील

(Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.