AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातला जाणारे पाणी अडवणार; जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमधील ग्रामीण भागातील पाणी योजनांची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत. (Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

गुजरातला जाणारे पाणी अडवणार; जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर
| Updated on: Nov 17, 2020 | 4:01 PM
Share

नाशिक: राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमधील ग्रामीण भागातील पाणी योजनांची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत. शिवाय गुजरातला वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावाही जयंत पाटील घेणार आहेत. (Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने पावसाचे हे पाणी गुजरातला वाहून जाते. हे पाणी गिरणा आणि गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून त्याचाच आढावा जयंत पाटील आजच्या नाशिक दौऱ्यात घेत आहेत. त्यांनी आज त्रिभूवन या आदिवासी बहुल भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी आमदार नितीन पवार, जे. पी. गावित यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित त्रिभूवन धरणासाठीची जागा संपादित करण्यात आली आहे, असं सांगतानाच स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न आधी सोडवणार, त्यानंतरच इतरत्र पाणी वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात हळूहळू सर्व उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे राज्याची तिजोरीही लवकरच भरेल, असं सांगतानाच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पाणी आडवा, वळवा आणि शेतीला द्या

दरम्यान, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी पाटील यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. येथील शेतामध्ये नागलीचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. या भागात सर्वाधिक पाऊस पडतो पण तरीही शेतीला पुरेसं पाणी मिळत नाही. या भागात नॅचरल फिल्टर असलेलं पाणी आहे. त्यामुळे पाणी आडवा, वळवा आणि शेतीला द्या, अशी मागणी झिरवळ यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

शिवाजी पार्कवर शपथ घेऊन एक वर्ष पूर्ण, पुढची चार वर्षं कशी जातील ते भाजपला कळणार नाही : जयंत पाटील

मंदिरं उघडण्याची ‘हीच ती वेळ’, सरकार पुढील चार वर्ष दिवाळी साजरी करणार : जयंत पाटील

(Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.