AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात लॉकडाऊन, कुठे काय सुरु आणि काय बंद?

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत जगभरातील 140 पेक्षा अधिक देशात या विषाणूने शिरकाव केला (Maharashtra lock down due to corona) आहे.

राज्यात लॉकडाऊन, कुठे काय सुरु आणि काय बंद?
| Edited By: | Updated on: Mar 22, 2020 | 4:46 PM
Share

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत जगभरातील 140 पेक्षा अधिक देशात या विषाणूने शिरकाव केला (Maharashtra lock down due to corona) आहे. तसेच अडीच लाखांहून अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारनेही 31 मार्चपर्यंत देशभरातील सर्व रेल्वे गाड्या आणि वाहतूक सेवा बंद केली आहे. त्यासोबत राज्य सरकारनेही महाराष्ट्रात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू होणार असल्याचे जाहीर केले आणि मुंबईसह राज्यातील रेल्वे वाहतूक आणि लोकल ट्रेनही 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासोबत शहरातील खासगी बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊन दरम्यान राज्यात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील तर बाकी सर्व बंद राहील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात कुठे काय सुरु?

राज्यात 31 मार्चपर्यंत खासगी ऑफिस आणि दुकानं बंद राहणार आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून सरकारकडून इतर सर्व अनावश्यक गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुठे काय बंद राहणार?

संपूर्ण देशात राज्यासह 31 मार्चपर्यंत मालगाडी वगळता संपूर्ण रेल्वे सेवा बंद राहणार आहे. त्यासोबत मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेनही बंद करण्यात येणार आहे. तसेच एसटी बस आणि खासगी बसेसही बंद करण्यात येणार आहे. खासगी कंपन्या आणि अत्यावश्यक दुकानं सोडून इतर सर्व दुकांन बंद राहणार आहेत, असं राज्य सरकारने सांगितले.

दरम्यान, देशभरात कोरोना विषाणू तिसऱ्या स्टेजमध्ये पसरु नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने मोठे निर्णय घेतले आहे. त्यामुळे पुढील 31 मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊन राहणार आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.