AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाविकास आघाडी सरकारला 5 नव्हे तर 25 वर्षे भीती नाही’, छगन भुजबळांचा दावा, भाजपवर टीकास्त्र

महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची टीका भाजप नेते सातत्यानं करत असतात. पण महाविकास आघाडी एकसंध राहील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

'महाविकास आघाडी सरकारला 5 नव्हे तर 25 वर्षे भीती नाही', छगन भुजबळांचा दावा, भाजपवर टीकास्त्र
| Updated on: Dec 06, 2020 | 2:48 PM
Share

नाशिक: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यावरुन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे नंबर एकचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली. जयसिंगराव गायकवाड यांनीही भाजपला रामराम ठोकला. पदवीधरमध्ये पुणे, नागपूरमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आहे. त्यामुळे आता राजकारणाची हवा बदलली आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलीय. (Chagan Bhujbal on mahavikas aghadi government)

महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची टीका भाजप नेते सातत्यानं करत असतात. पण महाविकास आघाडी एकसंध राहील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. आता भीती महाविकास आघाडी नाही तर भाजपच्या लोकांना आहे. भाजपमधील लोकप्रतिनिधींनी खडसे आणि जयसिंगरावांच्या पावलावर पाऊल टाकायचं ठरवलं तर अवघड होईल, असा टोलाही भुजबळांनी लगावला आहे. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारला आता 5 नाही तर 25 वर्षे भीती नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ओबीसींमध्ये दोन गट नाहीत- भुजबळ

ओबीसी समाजात दोन गट पडल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर ओबीसी समाजात दोन गट नाहीत, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील मोर्चात काही लोकांनी शरद पवार यांच्या फोटोवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय? महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला आहे. ओबीसींची वेगळी जनगणना व्हावी, यातही त्याचाच पुढाकार आहे. पवार हे सत्यशोधक समाजाच्या कुटुंबातून मोठे झाले आहेत. त्यामुळे सर्वांना मदत करण्याचीच त्यांची भूमिका असल्याचंही भुजबळ म्हणाले.

‘शेतकरी आंदोलनावर केंद्रानं भूमिका घ्यावी’

गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारनं भूमिका घ्यायला हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारनं सकारात्मकतेनं घेणं गरजेचं असल्याचं मत भुजबळांनी व्यक्त केलं आहे. शेतकरी आपल्या राज्यात परत गेले तर मोठी जखम देऊन जातील, असा इशाराही भुजबळांनी दिला आहे.

शेतकरी आंदोलन प्रश्नावर पवार राष्ट्रपतींना भेटणार

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत. शरद पवार हे सीताराम येचुरी आणि डी. राजा यांच्यासह राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार

भाजपने पराभवातून धडा घ्यावा; ईडी, सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण आता चालणार नाही: भुजबळ

Chagan Bhujbal on mahavikas aghadi government

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.