भाजपने पराभवातून धडा घ्यावा; ईडी, सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण आता चालणार नाही: भुजबळ

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे चमत्कार झाला. | Chhagan Bhujbal

भाजपने पराभवातून धडा घ्यावा; ईडी, सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण आता चालणार नाही: भुजबळ
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 3:38 PM

नाशिक: राज्यातील विधानपरिषद निवडणुकीतील पराभवातून भाजपने (BJP) धडा घ्यायला हवा. त्यांनी आता जमिनीवर उतरून काम करायला हवे. देशात आता ईडी आणि सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण चालणार नाही, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. (NCP leader Chhagan Bhujbal slams Chandrakant Patil)

ते शनिवारी लासलगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणुकीतील पराभवावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले. काही दिवसांपूर्वी इतरांना इकडेतिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांचाच डाव उलटला आहे. पुण्यात मेधा कुलकर्णी यांच्या जागेवर ते निवडून आले. मात्र, त्यानंतर मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, हे छगन भुजबळ यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे चमत्कार झाला. तिन्ही पक्षांची युती झाल्यामुळे मते विभागली गेली नाहीत. या निवडणुकीच्यानिमित्ताने जनतेने महाविकासआघाडीला स्वीकारलेले दिसले. अगदी पुणे आणि नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यातही मतदारांनी महाविकासआघाडीच्या बाजूने कौल दिला. या सगळ्यातून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी जमिनीवर उतरून काम करायला हवे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

यशोमती ठाकुरांच्या इशाऱ्याला भुजबळांचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याची टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून महाविकासआघाडीला इशारा दिला होता. हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी कराव, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले होते.

यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. यशोमती ठाकूर काय बोलल्या ते मी वाचले नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी एकत्रितरित्या काम करतात. तेव्हा कोणी काही विचारले तर बोलावे लागते. याचा अर्थ टोचून बोलणे होत नाही.

मी शिवसेना सोडली तेव्हा शिवसैनिकांनी माझ्यावर हल्ला केला होता. मला कोणी याविषयी विचारले तर मी सांगतो. याचा अर्थ मी शिवसेनेवर टीका करतो, असा नाही. आता ती गोष्ट इतिहासजमा झाली. आम्ही आता राज्यात एकत्रितपणे काम करत आहोत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं’, सतेज पाटलांचा खणखणीत टोला

येत्या काळात एकट्याला सत्ता स्थापण्याची संधी; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

भाजपची कबर खोदायला सुरुवात, भाजपचेच अहंकारी नेते पक्षाला बुडवणार, अमोल मिटकरींचा टोला

(NCP leader Chhagan Bhujbal slams Chandrakant Patil)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.